शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मासळीच्या आयातीवर बंदीचा फेरविचार करा - मायकल लोबो 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:55 PM

सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

म्हापसा - सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. तशी मागणी लोबो यांनी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली असल्याची माहिती लोबो यांनी पत्रकारांना दिली. 

राज्यात  फॉर्मेलिन असलेल्या मासळीची आयात होवू नये यासाठी आरोग्य मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून अशा प्रकारच्या मासळीतून लोकांच्या आरोग्याची असलेली चिंता त्यांना दिसून येत असल्याचे म्हणाले, मात्र आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे लोकांवर तसेच व्यवसायिकांवर त्याचे विपरीत परिणाम होणार असल्याचे लोबो म्हणाले. पत्रातून केलेल्या मागणी बरोबर त्यांच्याशी आपण स्वत: फोनवर चर्चा केली असून त्यांची भेट घेवून त्यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सोबत सुद्धा चर्चा करणार असल्याची माहिती लोबो यांनी यावेळी दिली. 

मासळीच्या आयातीवर बंदी लागू करण्यापेक्षा गोव्यातील शेजारील राज्य महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून येणाºया मासळीवर बंदी उठवावी. या भागातून मासळीची आयात करणारे वाहने फक्त दोन तासाच्या अंतरात गोव्यात दाखल होवू शकतात. त्यामुळे मासळीची वाहतूक करण्यासाठी इन्सुलेटेड वाहनाची गरज नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशातून येणाºया मासळीवर मात्र बंदी हवी असेही ते ठामपणे म्हणाले. बंदी लागू करण्यापेक्षा अन्न व औषधी प्रशासनाच्या वतिने ठोस उपाय योजना हाती घेणे मासळीची तपासणी करणे गरजेचे आहे. त्या करीता यंत्रणेचा वापर करुन उत्तरेत एक तर दक्षिणेत एका वाहनाचा वापर करुन मासळीची तपासणी करावी. त्यात फॉर्मेलिनची मासळी आढळून आल्यास त्यांना कठोर शासन करावे गरज पडल्यास पोलीस कारवाई सुद्धा करण्यात यावी अशीही मागणी लोबो यांनी केली. तसेच वेळ पडल्यास कायद्यात योग्य तो बदल करण्यासाठी पावले उचलण्याची सुचनाही लोबो यांनी केली. 

गोव्यात येणा-या पर्यटकाची किमान ८० टक्के पर्यटक मासळीचे सेवन करण्यासाठी येत असतात. त्यांना चांगली मासळी खाण्यासाठी हवी असते. आयातीवर बंदी लागू केली असल्याने किनारी भागातील हॉटेल्स तसेच शॅक व्यवसायिकांवर त्याचे प्रचंड परिणाम होत असल्याचे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होणार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची पाळी येणार असल्याचे सांगितले. गोव्यात मिळणारी मासळी लहान असल्याने लोकांना व्यवसायिकांना चालत नसल्याची माहिती दिली. 

मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे पापलेट, इसवण, सुरमई तसेच इतर मोठ्या प्रकारची मासळी दुर्मीळ होत चालली आहेत. गोव्यातील समुद्रात अशा प्रकारची मासळी मिळणे कठीण असल्याने त्यांची आयात करण्यापेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या मिळत असलेली मासळी गोवेकरांना विकत घेणे परवडण्यासारखी नसल्याची माहिती मायकल लोबो यांनी पत्रकारांना दिली. 

टॅग्स :goaगोवा