शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

ओखी वादळाच्या तडाख्यातून सावरलेले शॅक व्यावसायिक नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 13:20 IST

ओखी चक्रीवादळामुळे शॅक्सचं झालेलं नुकसान विसरुन शॅक व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेऊन नाताळ तसेच नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी  येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

म्हापसा : ओखी चक्रीवादळामुळे शॅक्सचं झालेलं नुकसान विसरुन शॅक व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेऊन नाताळ तसेच नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी  येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. शनिवारच्या विकएण्डपासून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ सुरु होणार आहे. हा ओघ नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत राहणार आहे.  

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गोव्यासह इतर राज्यातील किनारी भागात धडकलेल्या ओखी चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर तडाखा दिला होता. गोव्यात मच्छीमार बांधवा समवेत किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या शॅक व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यात तसेच दक्षिणेतही शॅक्सचं मोठं नुकसान झालं. झालेल्या नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात गेला होता. या महिन्यात काही शॅकवर नृत्य रजनीचे आयोजन केले जाते. काही शॅकवर पार्ट्यासुद्धा आयोजित होत असतात. त्यामुळे शॅक धारकांसाठी डिसेंबर महिना हा ऐन कमाईचा महिना असतो. होत असलेल्या कमाईतून झालेल्या नुकसानीतील किमान नुकसानी या महिन्याभरात भरुन काढण्याच्या प्रयत्नात हे व्यवसायिक आहेत. 

महिन्याभरात देश विदेशातून लाखोंनी पर्यटक तसेच विदेशात स्थायिक झालेले अनिवासी गोमंतकीय गोव्यात डिसेंबरात होणारा नाताळ सण तसेच त्यानंतर येणारे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दाखल होत असतात. येणारे हे लोक आपल्या वास्तव्यातील बहुतेक काळ किनाऱ्यावर व्यथित करणे पसंद करीत असतात. आलेले पर्यटक तर जास्त करुन किनारी भागातील हॉटेलातच निवासासाठी राहतात. त्यामुळे शॅकधारकांना त्याचा चांगलाच फायदा होत असतो. 

वादळाच्या तडाख्याचा सामना केल्यानंतर उद्भवलेल्या नुकसानीच्या कठीण प्रसंगातून मार्ग काढीत शॅकधारकांनी नव्याने आपल्या शॅकांची उभारणी करण्याचे काम सुरु केले होते. ते जवळ जवळ पूर्ण झाले असून पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी ते तयार झाले आहेत. ही तयारी करताना बऱ्याच प्रमाणावर दक्षता बाळगण्यात सुद्धा आली आहे. काही शॅकधारकांनी वादळापासून संरक्षणासाठी उपाय योजना सुद्धा केलेल्या आहेत. 

शॅक मालक कल्याण समितीचे अध्यक्ष कु्रज कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नवत अशा प्रकारे आलेल्या ओखी वादळानंतर शॅक व्यवसायीक सावरले असून आपला व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच जणांनी कर्ज काढून व्यवसाय पुर्नजीवीत करण्यात भर दिला असल्याचे कार्दोज म्हणाले. 

नुकसानी झालेल्या बऱ्याच शॅक धारकांनी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. केलेल्या मागणीनुसार सरकारकडे पाठपुरवठा करण्याचे काम सुरु असून त्यासाठी काही शॅकधारकांकडून झालेल्या नुकसानीची विस्तारीत माहिती जमवण्याचे काम सुरु असल्याचे कार्दोज म्हणाले. प्रत्येक शॅकधारकाला त्यासंबंधीची माहिती देण्याच्या सुचना करण्यात आली असल्याचे कार्दोज म्हणाले.  

टॅग्स :goaगोवा