शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

भाजपमध्ये आता झालेय 'मिक्स भाजी आणि खतखते': रमेश तवडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 07:30 IST

पर्रीकरांवेळचे निष्ठावान कार्यकर्ते शोधावे लागत असल्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'भाजपात आता मिक्स भाजी आणि खतखते झालेले आहे. निष्ठावान कार्यकर्ते शोधूनही सापडेनासे झाले आहेत,' असे विधान करीत सभापती रमेश तवडकर यांनी इतर पक्षांमधून नेते, कार्यकर्ते आयात करण्याच्या पक्षाच्या धोरणावर हल्लाबोल केला. 'श्रमधाम' उपक्रमासंबंधी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.

सभापती तवडकर म्हणाले की, 'पर्रीकर एवढ्या लवकर आमच्यातून जातील असे कोणालाही वाटले नव्हते. हयात असते तर आणखी दहा वर्षे तरी सक्रिय राजकारणात राहिले असते. पर्रीकर यांना मानणारा मोठा वर्ग होता. पेडणे ते काणकोणपर्यंत त्यांच्याशी कार्यकर्ते एकनिष्ठ होते. निष्पाप भावनेने कार्यकर्ते काम करायचे. कालांतराने राजकीय बदल झाले आणि आता तर मिक्स भाजी आणि खतखते झाले आहे. ते निष्ठावान कार्यकर्ते कुठे आहेत, हे शोधूनही सापडत नाही. 'समस्या अनेक आहेत. त्यावर तोडगा काढायचा असेल तर चिंतन व्हायला हवे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. खरेतर हीच आमची शिदोरी आहे. सत्ता असल्याने कार्यकर्त्यांची कामे व्हायला हवीत. त्यांच्या अडचणी दूर व्हायला हव्यात.'

दरम्यान, तवडकर यांनी काणकोणमध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यावर २०१७ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. परंतु २०२२च्या निवडणुकीआधी ते भाजपात आले. ते भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन नंतर सभापती बनले.

यापूर्वीही खळबळजनक विधान

दरम्यान, तवडकर यांनी अलीकडेच मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी विधान करून अशीच खळबळ उडवून दिली होती. पंधरा दिवसांच्या आत मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असून नीलेश काब्राल, दिगंबर कामत व इतरांची नावे चर्चेत मीडियामध्ये असल्याचे ते म्हणाले होते. आमदार, मंत्री तसेच भाजपमध्येही यामुळे चलबिचल झाली होती. परंतु, नंतर पत्रकारांनी विचारले असता मंत्रिमंडळ फेररचनेचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे नमूद करून आपण यासंबंधी अधिक भाष्य करू इच्छित नसल्याचे ते म्हणाले होते.

पर्रीकरांनंतर मी तवडकरांना मानतो : दयानंद सोपटे

कार्यक्रमास उपस्थित मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे म्हणाले की, 'पर्रीकरांनंतर मी तवडकर यांना मानतो. माझ्या मते पर्रीकरांनंतर पहिले नाव तवडकरांचेच येते. श्रमधाम संकल्पनेंतर्गत त्यांनी आम्हाला काम करण्यासाठी प्रवृत्त केले. दोन वर्षांत गरीब, गरजूंना चाळीस घरे बांधून दिली. आता घरांची संख्या शंभरावर नेण्यासाठी तवडकरांचे हात आम्हाला बळकट करावे लागतील. तवडकर यांनी स्वतः गरिबी भोगली आहे, त्यामुळे गरिबांच्या यातना त्यांना ठाऊक आहेत. ते स्वतः हातात फावडे, कुदळ घेऊन वावरतात. श्रमदानासाठी भावना जागृत करण्याचे मोठे काम ते करत आहेत. मी यापूर्वी त्यांच्या निवडणुकीसाठी खोतीगावसारख्या भागात डोंगर चढून प्रचार केला. यावेळी तवडकरांना मोठ्या प्रमाणात लोक मानतात हे मला त्यावेळी दिसून आले.

निष्ठावान कार्यकर्ते, नेत्यांवर अन्याय झाला

आता भाजपमधील 'मिक्स भाजी आणि खतखते' यासंबंधीचे त्यांचे विधान चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांत खासकरून फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक आमदार व त्यांचे कार्यकर्ते आयात केले. जुलै २०१९ मध्ये व त्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे अनुक्रमे दहा व आठ आमदार फोडले. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, नेत्यांवर यामुळे अन्याय झाला. तवडकर यांनी वरील कार्यक्रमात मनातील हे शल्य व्यक्त केल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणतात, मला काही ठाऊक नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना 'लोकमत' प्रतिनिधीने तवडकरांच्या या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'मी संपूर्ण दिवस कार्यक्रमात व्यस्त होतो. सायंकाळी उशिरापर्यंत साखळीत होतो. तवडकर यांच्या या विधानाबद्दल मला काही माहीत नाही. त्याबद्दल मी जाणून घेईन व नंतरच भाष्य करीन.' 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण