शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात किनारी भागातील व्यवसाय थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 15:36 IST

चतुर्थीच्या सुट्टीत पर्यटकांनी किनारी भागाकडे फिरवलेली पाठ यामुळे कळंगुट भागातील व्यावसायिकांचा व्यवसाय थंडावल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झाले.

म्हापसा - मागील काही दिवसात पडलेला जोरदार पाऊस पडला. तसेच चतुर्थीच्या सुट्टीत पर्यटकांनी किनारी भागाकडे फिरवलेली पाठ यामुळे कळंगुट भागातील व्यावसायिकांचा व्यवसाय थंडावल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. सुरू होणारा पुढील पर्यटन हंगाम कसा असेल याबाबत त्यांना आताच चिंता वाटू लागली आहे.

मागील काही वर्षाच्या तुलेनत या वर्षी पावसाने बराच जोर धरला होता. त्यामुळे इतर वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होती. आशियातील काही पर्यटकांनी गोव्यात येण्यासाठी पर्यटकांना दिलेल्या पॅकेजसोबत अनेक देशी पर्यटक गोव्यात पावसाळ्यात येत होते. पाण्यात जाण्यावर प्रतिबंध असले तरी पर्यटनाचा आनंद ते लूटत होते. चतुर्थीच्या काळात असलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढत होती; पण यंदा मात्र पावसाळ्यात पर्यटकांनी किनारी भागाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

पर्यटकांच्या कमतरतेमुळे किनारी भागातील बऱ्याच हॉटेल्स तसेच रिसॉर्ट व्यावसायिकांनी भाडे सुद्धा कमी केल्याचे दिसून आले. काही हॉटेल्स मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलातील बुकिंगचे प्रमाण मागील वर्षापेक्षा 50 टक्क्यांहून कमी होते. पावसाळ्यात झालेल्या बुकिंगचे प्रमाण पाहता येणारा हंगाम कसा असेल यावर व्यावसायिकांना आताच चिंता वाटू लागल्याचे सांगितले आहे.

एका हॉटेल व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका, थायलंडसारख्या देशात जाणे पर्यटकांना परवड असल्याने त्यांनी गोव्याकडे पाठ फिरवली असल्याची माहिती एका स्थानिकाने दिली. त्या देशाच्या तुलनेत गोव्यातील महागडे तसेच दर न परवडणारे असल्याने पर्यटक येण्यास टाळतात. त्याचे परिणाम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

बागा परिसरातील एक हॉटेल व्यावसायिक शॅरवीन लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम पर्यटन व्यवसायावर झाले असल्याचे सांगितले. सुमारे 70 टक्क्यांनी पर्यटकांनी संख्या कमी झाली असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली. भाडेपट्टीवर वाहने देण्याचा व्यवसाय करणारा व्यवसायिक आलेक्स फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुर्थीच्या काळात एकही वाहन भाडेपट्टीवर गेले नसल्याचे ते म्हणाले.

रोडावलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे काही हॉटेल व्यवसायिकांनी भाडे 30 ते 40 टक्क्यांनी कमी केले आहे. एसी रुमच्या खोल्या गेल्या वर्षी 2500 रुपये प्रतीदिन याप्रमाणे देण्यात आलेल्या या वर्षी याच खोल्या 1500 पर्यंत पर्यटकांना देण्यात आल्या आहे. इतरही खोल्यांचे भाडे तसेच खाद्यपदार्थांचे भाव सुद्धा कमी करण्यात आले आहे. पर्यटकांच्या संख्येत कमी झालेल्या प्रमाणात उघड्यावर मद्यप्राशन करण्यास बंदी लागू केली असल्याने त्यात भर पडली आहे. 

 

टॅग्स :goaगोवा