शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात धुवाधार सुरुच : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:16 IST

एक दिवस पावसाने विश्रांनी घेतली पण शुक्रवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

(नारायण गावस : पणजी गोवा) : शुक्रवारी मुसळधार पावसाने गोव्याला पुन्हा झोडपून काढले, ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली पडझडीमुळे ठिकठिकाणी वीज गुलही झाली. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवारी एक दिवस पावसाने विश्रांनी घेतली पण शुक्रवार पासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

 गेल्या रविवारी आणि सोमवारी पावसाने राज्याला झोडपून काढले होते. नंतर दाेन दिवस ओसरला पण आज शुक्रवार सकाळपासून पुन्हा पावसाने झोडपून काढले. त्यामुळे राज्यातील रस्त्यावर पाणी तुंबले होते. मुसळधार पडत असलेल्या पावसाने अनेक  ठिकाणी झाडे पडली  त्यामुळे लाेकांना याचा फटका बसला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही साफसफाईची कामे करण्यात आली.

: राज्यात ऑरेंज अलर्ट

राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून १४ जुलै पर्यंत ऑरेज अलर्ट जारी केला आहे.  तर १५ व १६ जुलै रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे राज्यात पुढील पाच दिवस जाेरदार पावसाची शक्यता असून वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे मच्छिमाऱ्यांना खोल समुद्रात न जाण्याचा  इशारा राज्य हवामान खात्याने दिला आहे.

: नदी धरणांची पातळी वाढली

मुसळधार पडत असलेल्या पावसाने राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावली धरण भरले आहे तर अंजूणे धरणही ६० टक्के भरले आहे.  इतर धरणे भरली आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील इतर प्रमुख नद्या व उपनद्यांची पातळी वाढल्याने नद्या शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा आपत्कालीन व्यवस्थापनाने दिला आहे. गेल्या आठवड्यात ५ जणांना मुसळधार पावसाने बळी गेला होता.  तसेच अनेक गुरेही वाहून गेली होती. असे अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाचे  कर्मचारी  तसेच दलाचे जवान  याकडे लक्ष ठेऊन आहेत.

टॅग्स :goaगोवा