शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2024 13:04 IST

पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : आगामी लोकसभेची निवडणूक ही देशाचा नेता निवडीसाठी आहे, हे लक्षात घेऊन मतदान होण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कमी झालेली टक्केवारी चिंताजनक आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे.

पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, राज्य प्रभारी आशिश सूद, खासदार श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, दामू नाईक उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात कमी झालेल्या टक्केवारीची दोन कारणे आहेत. वाढलेले तापमान, तसेच केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे मतदारांनी गृहीत धरल्याने मतदानापासून ते दूर राहिले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल, याची दक्षता घ्या, अशी सूचना तावडे यांनी यावेळी केली.

यावेळी डॉ. सुनील यांनी आपली सूचना मांडताना जगभरात वाढलेल्या तणावामुळे मानसीक आजार हा इतर आजारांच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाचा आजार झाला आहे. त्यामुळे मानसोपचाराचा समावेश विमा योजनेंतर्गत करण्यात यावा, अशी सूचना मांडली. रोजगाराच्या उद्देशाने नागरिक देशभरात स्थलांतर करीत असतात. व्यवसायिकांना मनुष्यबळ (कामगार) मिळणे मुष्कील होत आहे. अशा लोकांच्या हितासाठी तसेच त्यांना योग्य रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने विशेष केंद्र स्थापन करावे, अशी सूचना निलेश गुप्ता यांनी केली.

डॉ. अविनाथ कांदे यांनी युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी पावले उचलण्याची सूचना केली. मंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी आपले विचार मांडले. दामू नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. किशोर अस्नोडकर यांनी सूत्रसंचालन केले

दुहेरी नागरिकत्वावर तोडगा काढावा

कास्तोलीनो यांनी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. बऱ्याच गोमंतकीयांनी पोर्तुगीज पासपोर्ट मिळविल्याने त्यांच्यावर भारतीय नागरिकत्व गमावण्याची पाळी आली आहे. ते मूळ भारतीय असल्याने देशावर त्यांचे प्रेम आहे. आजही बरेच लोक भारतात वास्तव करून राहतात. त्यांच्या हितासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी तावडे यांनी विदेश मंत्रालयाच्यावतीने त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन त्यांना दिले.

 

टॅग्स :goaगोवाVinod Tawdeविनोद तावडेgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४