शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2024 13:04 IST

पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : आगामी लोकसभेची निवडणूक ही देशाचा नेता निवडीसाठी आहे, हे लक्षात घेऊन मतदान होण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कमी झालेली टक्केवारी चिंताजनक आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे.

पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, राज्य प्रभारी आशिश सूद, खासदार श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, दामू नाईक उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात कमी झालेल्या टक्केवारीची दोन कारणे आहेत. वाढलेले तापमान, तसेच केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे मतदारांनी गृहीत धरल्याने मतदानापासून ते दूर राहिले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल, याची दक्षता घ्या, अशी सूचना तावडे यांनी यावेळी केली.

यावेळी डॉ. सुनील यांनी आपली सूचना मांडताना जगभरात वाढलेल्या तणावामुळे मानसीक आजार हा इतर आजारांच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाचा आजार झाला आहे. त्यामुळे मानसोपचाराचा समावेश विमा योजनेंतर्गत करण्यात यावा, अशी सूचना मांडली. रोजगाराच्या उद्देशाने नागरिक देशभरात स्थलांतर करीत असतात. व्यवसायिकांना मनुष्यबळ (कामगार) मिळणे मुष्कील होत आहे. अशा लोकांच्या हितासाठी तसेच त्यांना योग्य रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने विशेष केंद्र स्थापन करावे, अशी सूचना निलेश गुप्ता यांनी केली.

डॉ. अविनाथ कांदे यांनी युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी पावले उचलण्याची सूचना केली. मंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी आपले विचार मांडले. दामू नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. किशोर अस्नोडकर यांनी सूत्रसंचालन केले

दुहेरी नागरिकत्वावर तोडगा काढावा

कास्तोलीनो यांनी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. बऱ्याच गोमंतकीयांनी पोर्तुगीज पासपोर्ट मिळविल्याने त्यांच्यावर भारतीय नागरिकत्व गमावण्याची पाळी आली आहे. ते मूळ भारतीय असल्याने देशावर त्यांचे प्रेम आहे. आजही बरेच लोक भारतात वास्तव करून राहतात. त्यांच्या हितासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी तावडे यांनी विदेश मंत्रालयाच्यावतीने त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन त्यांना दिले.

 

टॅग्स :goaगोवाVinod Tawdeविनोद तावडेgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४