शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पुतळे नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार द्या, कोळसा प्रदूषण रोखा : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 14:20 IST

पुतळ्य़ांचा वाद नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार संधी द्या. कॅसिनो व कोळसा प्रदूषणापासून गोव्याची सुटका करा

पणजी : पुतळ्यांचा वाद नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार संधी द्या. कॅसिनो व कोळसा प्रदूषणापासून गोव्याची सुटका करा, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी येथे केली. गोवा फॉरवर्ड पक्षाला जर सत्ताच सोडायची असेल तर पुतळ्य़ांऐवजी कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई पाणी तंटा अशा विषयांवरून ती सोडावी, केवळ नाटके करून दाखवू नयेत असाही सल्ला चोडणकर यांनी दिला.

सिद्धनाथ बुयांव यांच्यासोबत चोडणकर यांनी काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. गोमंतकीय युवक आणि गोव्यातील लोक सरकारकडे चांगले भविष्य मागत आहेत पण सरकार मात्र त्यांच्यावर इतिहास लादू पाहत आहे. स्व. ज्ॉक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाबाबत व अस्मिता दिन आणि जनमत कौलाबाबत मुख्यमंत्री र्पीकर, मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मिळून नाटक लिहिले व हे तिन्ही नेते या नाटकातील स्वत:ची भूमिका पार पाडत आहेत. र्पीकर यांनी जनमत कौलाला पन्नास वर्षे होत असल्याने सरकार वर्षभर अस्मिता वर्षाचे कार्यक्रम साजरे करील असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मडगावमध्ये केवळ एका मतदारसंघापुरता दोन तासांचा एकच कार्यक्रम परवा वर्षभरात केला गेला. अस्मिता वर्ष साजरे करण्याबाबतची फाईल गेले दहा महिने मुख्यमंत्री र्पीकर यांच्या केबिनमध्ये पडून राहीली, असे चोडणकर म्हणाले. प्रादेशिक आराखडा, ग्रेटर पणजी अशा विषयांबाबतच्या फाईल्स मंत्री सरदेसाई हे लवकर मंजुर करून आणतात पण अस्मिता वर्षाबाबतची फाईल ते मुख्यमंत्र्यांच्या केबिनमधून गेले दहा महिने मंजुर करून आणू शकले नाही, अशी टीका चोडणकर यांनी केली.

लोकांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्याविरोधात कौल दिला. मात्र त्या कौलाची पर्वा न करता सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपसोबत सत्तेत गेला. लोकांच्या मताचा आदरच केला नाही. र्पीकर, विजय सरदेसाई वगैरे मंडळी जर खरोखर गोवा ओपिनियन पोलच्या काळात सत्तेत असती व त्यावेळी लोकांनी महाराष्ट्राविरुद्ध कौल दिला असता तर त्यावेळीच जनमताविरुद्ध जाऊन त्यांनी गोवा महाराष्ट्रात विलीन केला असता. या उलट जनमत कौल हरून देखील स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी लोकांच्या मताचा आदर करून गोव्याला स्वतंत्र ठेवले. बांदोडकरांकडे बहुमत होते पण त्यांनी लोकांनी दिलेला कौल स्वीकारला. बांदोडकरांकडून र्पीकर, सरदेसाई वगैरेंनी हे थोडे तरी गुण घ्यावेत असे चोडणकर म्हणाले. गोमंतकीयांचा गमावलेला विश्वास परत मिळतो का हे तपासून पाहण्यासाठी पुतळे व जनमत कौलाचे घोडे आता नाचविले जात आहेत. मात्र गोमंतकीय यावेळी फसणार नाहीत. ज्यांच्याकडे गोंयकारपण असते, त्यांनी ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडत नाही. कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई पाणी तंटा, कॅसिनो अशा सर्व विषयांबाबत सरदेसाई व त्यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपला साथ दिली. भाजपला तर जनमत कौल साजरा करण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. कारण जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी गोव्याच्या विलीनीकरणाच्याबाजूने होता. त्यांना एकीकरण हवे होते. भाजपने याबाबत अगोदर गोमंतकीयांची माफी मागावी असे चोडणकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस