शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुतळे नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार द्या, कोळसा प्रदूषण रोखा : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 14:20 IST

पुतळ्य़ांचा वाद नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार संधी द्या. कॅसिनो व कोळसा प्रदूषणापासून गोव्याची सुटका करा

पणजी : पुतळ्यांचा वाद नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार संधी द्या. कॅसिनो व कोळसा प्रदूषणापासून गोव्याची सुटका करा, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी येथे केली. गोवा फॉरवर्ड पक्षाला जर सत्ताच सोडायची असेल तर पुतळ्य़ांऐवजी कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई पाणी तंटा अशा विषयांवरून ती सोडावी, केवळ नाटके करून दाखवू नयेत असाही सल्ला चोडणकर यांनी दिला.

सिद्धनाथ बुयांव यांच्यासोबत चोडणकर यांनी काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. गोमंतकीय युवक आणि गोव्यातील लोक सरकारकडे चांगले भविष्य मागत आहेत पण सरकार मात्र त्यांच्यावर इतिहास लादू पाहत आहे. स्व. ज्ॉक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाबाबत व अस्मिता दिन आणि जनमत कौलाबाबत मुख्यमंत्री र्पीकर, मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मिळून नाटक लिहिले व हे तिन्ही नेते या नाटकातील स्वत:ची भूमिका पार पाडत आहेत. र्पीकर यांनी जनमत कौलाला पन्नास वर्षे होत असल्याने सरकार वर्षभर अस्मिता वर्षाचे कार्यक्रम साजरे करील असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मडगावमध्ये केवळ एका मतदारसंघापुरता दोन तासांचा एकच कार्यक्रम परवा वर्षभरात केला गेला. अस्मिता वर्ष साजरे करण्याबाबतची फाईल गेले दहा महिने मुख्यमंत्री र्पीकर यांच्या केबिनमध्ये पडून राहीली, असे चोडणकर म्हणाले. प्रादेशिक आराखडा, ग्रेटर पणजी अशा विषयांबाबतच्या फाईल्स मंत्री सरदेसाई हे लवकर मंजुर करून आणतात पण अस्मिता वर्षाबाबतची फाईल ते मुख्यमंत्र्यांच्या केबिनमधून गेले दहा महिने मंजुर करून आणू शकले नाही, अशी टीका चोडणकर यांनी केली.

लोकांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्याविरोधात कौल दिला. मात्र त्या कौलाची पर्वा न करता सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपसोबत सत्तेत गेला. लोकांच्या मताचा आदरच केला नाही. र्पीकर, विजय सरदेसाई वगैरे मंडळी जर खरोखर गोवा ओपिनियन पोलच्या काळात सत्तेत असती व त्यावेळी लोकांनी महाराष्ट्राविरुद्ध कौल दिला असता तर त्यावेळीच जनमताविरुद्ध जाऊन त्यांनी गोवा महाराष्ट्रात विलीन केला असता. या उलट जनमत कौल हरून देखील स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी लोकांच्या मताचा आदर करून गोव्याला स्वतंत्र ठेवले. बांदोडकरांकडे बहुमत होते पण त्यांनी लोकांनी दिलेला कौल स्वीकारला. बांदोडकरांकडून र्पीकर, सरदेसाई वगैरेंनी हे थोडे तरी गुण घ्यावेत असे चोडणकर म्हणाले. गोमंतकीयांचा गमावलेला विश्वास परत मिळतो का हे तपासून पाहण्यासाठी पुतळे व जनमत कौलाचे घोडे आता नाचविले जात आहेत. मात्र गोमंतकीय यावेळी फसणार नाहीत. ज्यांच्याकडे गोंयकारपण असते, त्यांनी ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडत नाही. कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई पाणी तंटा, कॅसिनो अशा सर्व विषयांबाबत सरदेसाई व त्यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपला साथ दिली. भाजपला तर जनमत कौल साजरा करण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. कारण जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी गोव्याच्या विलीनीकरणाच्याबाजूने होता. त्यांना एकीकरण हवे होते. भाजपने याबाबत अगोदर गोमंतकीयांची माफी मागावी असे चोडणकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस