शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

वचन देतो, वर्षभरात खाणी सुरू; गृहमंत्री अमित शाह यांचे गोमंतकीयांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 10:07 IST

काँग्रेसने केवळ लुटण्याचा उद्योग केल्याची टीका; लोकसभेत भाजपच्या पाठीशी उभे राहण्याची साद

फोंडा: खनिज व्यवसायावर गोव्यातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत, याची जाणीव सरकारला आहे. म्हणूनच आम्ही शब्द दिल्याप्रमाणे खनिज व्यवसाय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री व खाणमंत्र्यांच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला असून, एका वर्षात खनिज व्यवसाय सुरू होईल, अशी ग्वाही गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिली.

भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री गोविंद गावडे, मंत्री बाबू मोन्सेरात, मंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री रोहन खंवटे, मंत्री विश्वजित राणे, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री रवी नाईक मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री नीलेश काब्राल, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार केदार नाईक, डॉ. दिव्या राणे, प्रवीण आर्लेकर, राजेश फळदेसाई, जेनिफर मोन्सेरात, डिलायला लोबो, जोशुआ डिसोझा, प्रेमेंद्र शेट, रुडॉल्फ फर्नाडिस, उल्हास तयेकर दाजी साळकर, गणेश गावकर, संकल्प आमोणकर, दिगंबर कामत, आलेक्स सिकेरा यांच्यासह खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, चंद्रकांत कवळेकर एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की राज्य मोठे असो किंवा लहान, भाजप कधीच तिथल्या जनतेला गृहीत धरून चालत नाही जेवढे महत्त्व मोठ्या राज्यांना आहे, तेवढेच महत्त्व लहान राज्यांनाही आहे. या उलट काँग्रेस मात्र छोट्या राज्यांना गृहीत धरते. ईशान्येकडील तीन राज्यांत भाजपला या सिद्धांतामुळेच जे यश मिळाले, ते मिळाले. ज्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी गोव्याला फक्त ४३२ कोटी रुपयांचा निधी मिळायचा. आज भाजप सरकारमुळे गोव्याला प्रत्येक वर्षी ३ हजार आहेत. 

कोटी रूपये मिळत म्हणूनच आज गोव्याचा चौफेर विकास होताना दिसत आहे. शेजारील कर्नाटक राज्यातसुद्धा भाजपने कधीच निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळेच कर्नाटकातील जनतेचासुद्धा भाजपवरील विश्वास वाढलेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्येही बहुमताने भाजप सरकार स्थापन होणार आहे.

गोव्यात औषधालाही काँग्रेस शिल्लक नाही

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, स्थिर शासन हे स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. आज आपल्या कार्यकुशलतेमुळे प्रमोद सावंत यांनी गोव्यात स्थिर प्रशासन दिले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली गोव्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. आज गोव्यात औषधालासुद्धा विरोधक राहिलेला नाही. हा जसा लोकांचा विश्वास भाजपवर आहे, तसाच गोव्यातील प्रत्येक आमदार, मंत्री यांनी केलेल्या कामाचा तो परिपाक आहे.

मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

गोव्यातील खाणप्रश्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांशी चर्चा करून सोडविला. 'स्वयंपूर्ण गोवा' सारखा उपक्रम राबवून सर्वसामान्यांचा विकास साधण्याची हिमत केवळ मुख्यमंत्री सावंत यांनी दाखवली, असे सांगत गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाAmit Shahअमित शाहBJPभाजपा