शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पे पार्किंग पुढे ढकला : पणजीकरांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 13:39 IST

राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील बहुतांश रस्ते खोदले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करायला मिळत नव्हती यासाठी पणजी महानगर पालिकेने गेले दाेन महिने पणजीतील पे पार्किंग बंद ठेवली हाेती.

नारायण गावस

पणजी - राजधानी पणजी अजूनही स्मार्ट सिटीची कामे संपलेली नाही वाहनचालकांना होणारा त्रास संपलेला  नाही अशा स्थितीत पणजी महानगर  पालिकेने शहरात पें पार्किंग शुल्क आकारणी पुन्हा सुरु केल्याने पणजीवासियांनी तसेच पणजीत येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पणजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होईपर्यत पे पार्किंग आकारु नये असे पणजीवाकरांकडून मागणी केली जात आहे. 

राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील बहुतांश रस्ते खोदले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करायला मिळत नव्हती यासाठी पणजी महानगर पालिकेने गेले दाेन महिने पणजीतील पे पार्किंग बंद ठेवली हाेती. पण आता पणजीतील बहुतांश रस्त्यांचे हाॅटमिक्सींगचे काम पूर्ण झाल्याने पणजी महानगर पालिकेचे महापौर  राेहित मोन्सेरात यांनी  १ जून पासून हे पे पार्किंग पुन्हा सुरु केली आहे. तसेच पाहिल्यास पणजीत अजूनही बहुतांश रस्ते खाेदलेले आहेत. अनेक ठिकाणी मातीचे ढीगार आहेत. वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही पे पार्किंग आणखी  काही दिवस पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे. 

राजधानीत वाहतूकीला शिस्त  यावी पणजीत होणारी वाहतूक काेंडी कमी व्हावी यासाठी पणजीत महानगर पालिकेने राजधानीत पे पार्किंग सुरु केली आहे. पण पणजी  स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने वाहतूक  कोडी ही नित्याची झाली आहे.  ठिकठिकाणी  रस्ते खोदले असल्याने वाहनांना व्यवस्थित पार्किंग करायला जागाच मिळत नाही. लोकांना पे पार्किगच त्रास जाणवत होता. म्हणून फक्त दाेन महिने पे पार्किंग बंद करुन आता पुन्हा सुरु केल्याने लाेक नाराज आहे. स्मार्ट  सिटीचे काम पूर्ण होईपर्यंत राजधानीत पे पार्किंग घेऊ नये असे काही जणांचे मत आहे. 

पणजी स्मार्ट सिटीचे काम ९० टक्के झाले म्हटले तरी अजून काम पूर्ण झालेली नाही यातच आता पे पार्किंग करुन पणजीकरांच्या त्रासात आणखी पाडणार आहे. पणजीचे आमदार आणि मनपाच्या महापौरांनी कुणाची तरी आर्थिक भर करुन देण्यासाठी ही घाईगडबीडीत पे पार्किंग सुरु केली आहे. यात पणजी करांना विश्वासात घेतलेले नाही, असे शैलेद्र वेलिंगकर यांनी सांगितले.

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे अजून अपूर्ण आहे त्यामुळे पणजी महानगर पालिकेने पे पार्किंग सुरु करुन नये असे सांगितले. खोदकामुळे वाहनाचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत पे पार्किंग आकारणे चुकीचे आहे असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा