शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आदिवासींना राजकीय आरक्षण भविष्यात अशक्यच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 08:41 IST

स्वातंत्र्याला ७६ तर गोवा मुक्तीची साठी उलटली आहे. तरीही आरक्षण सोडाच, हा मुद्दा नेमका काय आहे, याची जाणीवही आम्हाला नाही.

- देविदास गावकर, पत्रकार व आदिवासी अभ्यासक

विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आधार म्हणून ठेवण्यात आलेले आरक्षण हे प्रामुख्याने जनगणनेवर आधारित असते. आणि ही तरतूद भारताच्या राज्यघटनेत ३३० कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्याला ७६ तर गोवा मुक्तीची साठी उलटली आहे. तरीही आरक्षण सोडाच, हा मुद्दा नेमका काय आहे, याची जाणीवही आम्हाला नाही.

राजकीय आरक्षण मिळायला हवे म्हणून प्रसाद गावकर, दिनेश जल्मी, सोयरू वेळीप, विठू मळीक, ज्योकीम पेरेरा आणि इतरांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपिलाला उत्तर देताना सर्वप्रथम न्यायालयाने विचारले की एवढे दिवस तुम्ही कुठे होता?

गोव्याला मुक्ती मिळाल्यानंतर खरेतर त्वरित आरक्षण मिळण्याची गरज होती; पण यावेळी आदिवासी म्हणून आरक्षण मिळवण्याऐवजी आदिवासी समुदायातील नेते आम्ही आदिवासी नाही, मागासवर्गीय नाही, अशी भूमिका मांडत होते. आणि त्याही पुढे जाऊन विधानसभेत ठराव घेणाऱ्या व्यक्तीही याच समुदायातील नेते होते; पण विसाव्या शतकाच्या अखेरीस गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर या फेडरेशनतर्फे हा विषय गंभीरपणे पुढे नेण्यात आला. २००३ साली कसेबसे गोव्यातील आदिवासींना 'आदिवासी' हा दर्जा मिळाला. दर्जा मिळाल्यानंतर त्वरित खऱ्या अर्थाने आदिवासी समुदायाची जनगणना व्हायला हवी होती. जनगणना झाल्यानंतर भौगोलिकरित्या आदिवासी क्षेत्रे सरकारी दप्तरात नोंद व्हायला हवी होती. यावरून आदिवासींची लोकसंख्या, आदिवासींची मतदार संख्या आणि आदिवासी क्षेत्रे जाहीर करून त्यानुसार भारताच्या राज्यघटनेतील पाचवे शेड्यूल लागू करण्यात यायला हवे होते; पण याविषयी आदिवासींचे नेते अनभिज्ञ असल्याने सर्व काही जशास तसे राहिले.

आरक्षणाचा / दर्जाचा विषय येतो तेव्हा सर्वप्रथम जनगणना हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. २००३ साली सरकारने गोव्यात आदिवासींना मागासवर्गीय दर्जा दिला. खरे तर १९९१ साली झालेल्या जनगणनेच्या आधारावर तो दर्जा मागितला होता. त्यावेळी खऱ्या अर्थाने आदिवासींची संख्या गोव्यात ३० टक्के होती; पण सरकारने २००२ च्या जनगणनेनुसार हा आकडा १२ टक्क्यांवर आणला. यावेळी फक्त गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर फेडरेशननेच आपली टक्केवारी कमी केल्याचा आक्षेप घेतला होता आणि सरकारची जनगणना चुकीची असल्याचे आपण स्वतः काही गावांत सर्वेक्षण करून सिद्ध केले होते. या विषयाचे गांभीर्य 'गाकुवेध' शिवाय कुणालाच कळले नाही. 

गोव्याची सतत वाढणारी लोकसंख्या आणि बाहेरच्या लोकांचे स्थलांतर यामुळे आदिवासी संख्येची टक्केवारी झपाट्याने कमी होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार ती ३० टक्के होती, २००२ साली ती १२ टक्क्यांवर आली. तर २०११ च्या जनगणनेनुसार ती १०.२३ झाली. म्हणजे २० वर्षांत सुमारे २० टक्क्यांनी संख्या घटली. आणि आता केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानुसार हे आरक्षण मिळणेच अशक्य आहे. ते कसे ते पाहूया.

राजकीय आरक्षणासाठी मागितलेल्या पिटिशनमध्ये दुसरा मुद्दा असा होता की २०२६ नंतर करण्यात आलेल्या जनगणनेनंतरच आरक्षणाचा मुद्दा विचारात घेण्यात येईल. हाच मुद्दा आता केंद्र सरकारने उपस्थित केला आहे. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये व्हायला हवी होती; पण ती झाली नाही. आता ती २०३२ मध्ये होणार आहे. या जनगणनेनंतर मतदार संघात फेररचना करण्याची समिती स्थापन करून त्याद्वारेच हे कार्य पुढे नेले जाईल. यासाठी या कमिटीला फेररचनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळ जवळ पाच ते सात वर्षांचा कालावधी लागतो. म्हणजे तोवर २०३८ साल उजाडणार. त्यापूर्वी गोव्यात आदिवासींना राजकीय आरक्षण मिळणे शक्यच नाही, हे कोर्टाच्या आदेशावरूनच स्पष्ट होत आहे.

टक्केवारी घसरण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टाच्या आदेशाचा विचार केला तर १९९१ ते २०११ या २० वर्षांच्या कालावधीत आदिवासी लोकांची जनसंख्या ३० टक्क्यांवरून १०.२३ टक्के झाली. मग येणाऱ्या पुढील वीस वर्षांत हा आकडा किती खाली येईल? याचा विचार प्रत्येक आदिवासी व्यक्तीने करणे आवश्यक आहे.

राज्यातील स्थलांतरितांचा विचार करून फक्त दोन टक्केच घट गृहीत धरली तर २०२१मध्ये आदिवासी लोकंख्या ८.२३ टक्के तर २०३२ साली ती ६.२३ टक्के होईल.

सध्या विधानसभेत ४० आमदार असून ६.२३ नुसार वाटणी केल्यास आरक्षणाद्वारे जास्तीत जास्त दोन मतदारसंघांमध्ये आरक्षण मिळणार आहे. यात आदिवासी क्षेत्राचा विचार केला तर ४० पैकी २४ मतदारसंघांत आदिवासी समुदाय आहे, तर १६ मतदारसंघात आदिवासी मतदार नाहीत. मग ज्या ठिकाणी आदिवासी मतदार नाहीत, त्याचा हिशेब आदिवासी आरक्षणासाठी का करायचा...? असा विचार केल्यास ही टक्केवारी शून्य होते आणि त्यानुसार आदिवासींना राजकीय आरक्षण मिळणेच यापुढे अशक्य असल्याचे सिद्ध होते.

 

टॅग्स :goaगोवाreservationआरक्षण