शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

लोकांना सरकारी नोकऱ्याच हव्यात!: सभापती गणेश गावकर, 'लोकमत' कार्यालयाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:14 IST

कर्मचारी भरती आयोग स्थापन करूनही लोकांची मानिसकता बदललेली नाही

लोकमत विशेष, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकांना आमदार, मंत्र्‍यांकडून केवळ सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. इतर कोणतेही मुद्दे त्यांच्यासाठी गौण असतात. विकासकामे कितीही करा पण जर संबंधितांची नोकरीची अपेक्षा पूर्ण केली नाही तर त्या लोकप्रतिनिधीला रोषाला सामोरे जावे लागते. आयोग स्थापन करूनही लोकांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही, असे मत नवनिर्वाचित सभापती गणेश गावकर यांनी व्यक्त केले.

सभापती गावकर यांनी काल, शनिवारी 'लोकमत' कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना मुक्तपणे उत्तरे दिली. गावकर म्हणाले की, आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आलेल्या अनुभवातून मतदारांच्या अपेक्षा काय असतात आणि त्यात ते प्राधान्य कशाला देतात हे समजले आहे. विकास व इतर मुद्दे आहेतच, परंतु सर्वात अधिक प्राधान्य हे सरकारी नोकरीला असते. एका घरात दोन मुले असतील तरी दोन्ही मुलांना नोकरी द्यावी, अशी अपेक्षा संबंधितांची असते. जर त्यांचे काम केले नाही तर रोषाला सामोरे जावे लागते.

नोकरभरतीचे अधिकार नोकरभरती आयोगाकडे दिल्यानंतरही मतदारांच्या अपेक्षा कमी झालेल्या नाहीत. नोकरभरती आयोगातर्फे नोकरभरती हा एक चांगला प्रभावी आणि पारदर्शी निर्णय आहे. परंतु तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची या आयोगातर्फे भरती करण्याच्या प्रक्रियेबाबत आणखी सुधारणार घडवून आणण्यास वाव आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभेचे अध्यक्ष म्हणून या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे गावकर यांनी सांगितले. सभापतिपद हे कमी महत्त्वाचे पद असल्याचा दावा त्यांनी फेटाळला. हे पद लहान नसून राज्यात विद्यमान परिस्थितीत शिष्टाचारानुसार हे पद राज्यपाल व मुख्यमंत्र्यानंतर येते, असे त्यांनी सांगितले. कारण सभापतिपदापेक्षा वरच्या क्रमांकावर येणारे उपमुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश ही पदे राज्यात नाहीत, असेही ते म्हणाले.

समिती प्रभावी करणार

एकदा विधानसभेत एखाद्या मंत्र्याने कोणतेही आश्वासन दिले की त्या आश्वासनाची पूर्ती ही झालीच पाहिजे. नपेक्षा त्या समितीलाही काहीच अर्थ नसतो आणि आश्वासनांनाही काहीच अर्थ असणार नाही. त्यामुळे येत्या काळात ही समिती प्रभावी केली जाईल, असे सभापती गावकर यांनी सांगितले.

... तरच सायरन वाजवा

सायरन वाजवत मतदारसंघात फिरणे मला आवडत नाही. पण सभापतींसाठीचा जो प्रोटोकॉल आहे तो मला पाळावाच लागेल, जर मी हा प्रोटोकॉल पाळला नाही तर भविष्यात जो कुणी सभापती आहे त्याच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. तसेच वेळेत पोहचण्यासाठी सायरनचा उपयोग होतो आणि सुरक्षतेच्यादृष्टीने ते महत्त्वाचे असते. मात्र, गरज असेल तिथेच सायरन वाजवत चला, असे सुरक्षारक्षकांना सांगितल्याची माहिती गावकर यांनी दिली.

तावातावाणे बोलण्यापेक्षा योग्य पद्धतीने मुद्दे मांडावेत

विधानसभेचा कालावधी किती असावा यात सभापतीची कोणतीही भूमिका नसते. परंतु उपलब्ध वेळ कसा वापरावा हे सभापतीच्या हाती आहे. प्रत्येकाने आमदार म्हणून आपली जबाबदारी, सभागृहाच्या कामकाजाची माहिती समजून घेतली तर कामकाज सुरळीत चालविणे शक्य आहे. केवळ गदारोळ करणे आणि तावातावाने बोलणे हे विधानसभापटूचे काम नव्हे. ज्या भूमिकेमुळे आपल्या मतदारसंघातील लोकांचा फायदा होईल ती भूमिका योग्यपणे मांडण्याचे कसब आमदारांमध्ये हवे, असेही गावकर म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : People Want Government Jobs Only: Speaker Ganesh Gavkar, Lokmat Visit

Web Summary : People prioritize government jobs over development, says Speaker Ganesh Gavkar during a Lokmat visit. He emphasized the need for improved third-class employee recruitment processes and committed to upholding the dignity of his position, advocating for responsible conduct in the Assembly.
टॅग्स :goaगोवाLokmatलोकमतBJPभाजपाPoliticsराजकारण