शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मंत्री सरदेसाई यांच्याशी पक्ष नेतृत्व बोलेल : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 9:36 PM

राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.

पणजी  - राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.

प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी प्रेमानंद म्हांब्रे व हेमंत गोलतकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. खाणबंदीवर तोडगा निघाला नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही भाजपला पाठींबा द्यावा की नाही याबाबत फेरविचार करावा लागेल असे मंत्री सरदेसाई म्हणाले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारताच नाईक म्हणाले, की भाजपचे नेतृत्व सरदेसाई यांच्याशी बोलून त्यांचे म्हणणो जाणून घेतील. खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत. काँग्रेस पक्ष तसे चुकीचे चित्र उभे करत आहे. खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच नव्हे तर आताच पुन्हा सुरू व्हाव्यात असे सगळ्य़ाच मंत्री, आमदारांना व भाजपलाही वाटते. सरकार त्यावर उपाय काढील. खनिज खाण घोटाळ्य़ात काँग्रेसचे नेते अडकले आहेत, भाजपचे नव्हे.

यात्र नव्हे स्टंट (चौकट)

काँग्रेसची सध्याची नमन तुका गोंयकारा ही यात्र म्हणजे प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे, अशी टीका नाईक यांनी केली. राज्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर येत नाही म्हणून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे वैफल्यग्रस्त बनले आहेत व त्यामुळे ते यात्र काढत आहेत. सासष्टीत झालेल्या यात्रेवेळी काँग्रेसचे केवळ एकच आमदार सहभागी झाले. काँग्रेस पक्षाने लोकांच्या समस्या जरूर ऐकून घ्याव्यात पण या समस्या सोडविणो काँग्रेसला शक्य आहे का ते सांगावे, असे नाईक म्हणाले. 

काँग्रेसने सात दिवसांचा अवधी राज्यपालांना दिला होता. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला बोलाविले जावे असे काँग्रेसचे म्हणणो होते. सात दिवसांची मुदत संपली. आता यापुढे काँग्रेस पक्ष काय करणार ते त्या पक्षाने जाहीर करावे. काँग्रेसचे एक माजी मुख्यमंत्री म्हणतात, की गोवा विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जातील. काँग्रेसचे हे दिवास्वप्न आहे. विद्यमान भाजपप्रणीत आघाडी सरकार हे पाच वर्षे टीकेल हे काँग्रेसने लक्षात ठेवावे, असे नाईक म्हणाले.

काँग्रेस नेते यात्रेवेळी बसमधून फिरतात असे दाखविले जाते. प्रत्यक्षात त्या बसमध्ये कुणीच प्रवासी दिसत नाहीत. फक्त सात-आठ काँग्रेस कार्यकर्ते तेवढे दिसून येतात. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष पुढे काय करील ते चोडणकर यांनी सांगावे. लोकांची दिशाभुल करू नये. काँग्रेसच्या मतदारसंघात व विशेषत: सत्तरी तालुक्यात जाऊन चोडणकर यांनी यात्र काढावी असे आव्हान असल्याचे नाईक म्हणाले.

दरम्यान, येत्या 26 रोजी केंद्रातील भाजप सरकार चार वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने दि. 26 पासून पंधरा दिवस पक्षातर्फे विविध कार्यक्रम होतील. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणnewsबातम्या