शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:57 IST

मगोप आणि गोवा फॉरवर्डला सरकारची साथ सोडण्याचं आवाहन

पणजी: राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. गेल्या सहा महिन्यात मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकलेली नाही. खाणबंदीसारखा गंभीर विषय सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर मगोप आणि गोवा फॉरवर्ड या घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी,  असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यतिश नायक यांनी केली आहे.पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री पर्रिकर हे आजारी आहेत. त्यांना अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेले. परंतु नेमका कोणता आजार त्यांना जडला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सरकारने अद्याप जनतेसाठी जाहीर केलेली नाही. त्यांच्या आजाराबद्दल लपवाछपवी चालली आहे. राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न सुटू शकलेले नाहीत. बंद खाणी पूर्ववत कधी सुरू होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. बेकारीची समस्या उग्र स्वरूप धारण करून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घटक पक्षांनी जनतेचे हित पाहून सद्सद्विवेक बुद्धीने सरकारपासून फारकत घेण्याची गरज आहे.नायक पुढे म्हणाले की, काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अजूनही सक्षम आहे. आमचे दोन आमदार भाजपने पळवले असले, तरी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा करीत ते म्हणाले की, 'राज्यपालांना पाच वेळा निवेदने दिली. राष्ट्रपतींनाही निवेदन पाठवले. परंतु अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.' भाजपकडे आज नेता नाही, तत्त्वे नाहीत आणि कोणते धोरणही नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे, असा दावा करताना  नायक म्हणाले की, सरकार कर्जावर कर्जे काढत आहे. अलीकडेच १०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. आणखी किती कर्जे काढणार, असा सवाल त्यांनी सरकारला केला.गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसात गुंडाळण्यात आले. त्यांच्या आजाराबद्दल भाजपकडूनही लपवाछपवी चालली आहे. सरकार नेतृत्वहीन बनले आहे, असा आरोप नायक यांनी केला. पत्रकार परिषदेस पक्षाचे पदाधिकारी विजय पै उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा