शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:57 IST

मगोप आणि गोवा फॉरवर्डला सरकारची साथ सोडण्याचं आवाहन

पणजी: राज्यातील प्रशासन कोलमडले आहे. गेल्या सहा महिन्यात मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकलेली नाही. खाणबंदीसारखा गंभीर विषय सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर मगोप आणि गोवा फॉरवर्ड या घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी,  असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यतिश नायक यांनी केली आहे.पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री पर्रिकर हे आजारी आहेत. त्यांना अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेले. परंतु नेमका कोणता आजार त्यांना जडला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सरकारने अद्याप जनतेसाठी जाहीर केलेली नाही. त्यांच्या आजाराबद्दल लपवाछपवी चालली आहे. राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न सुटू शकलेले नाहीत. बंद खाणी पूर्ववत कधी सुरू होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. बेकारीची समस्या उग्र स्वरूप धारण करून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घटक पक्षांनी जनतेचे हित पाहून सद्सद्विवेक बुद्धीने सरकारपासून फारकत घेण्याची गरज आहे.नायक पुढे म्हणाले की, काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अजूनही सक्षम आहे. आमचे दोन आमदार भाजपने पळवले असले, तरी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा करीत ते म्हणाले की, 'राज्यपालांना पाच वेळा निवेदने दिली. राष्ट्रपतींनाही निवेदन पाठवले. परंतु अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.' भाजपकडे आज नेता नाही, तत्त्वे नाहीत आणि कोणते धोरणही नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे, असा दावा करताना  नायक म्हणाले की, सरकार कर्जावर कर्जे काढत आहे. अलीकडेच १०० कोटी रुपयांचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. आणखी किती कर्जे काढणार, असा सवाल त्यांनी सरकारला केला.गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसात गुंडाळण्यात आले. त्यांच्या आजाराबद्दल भाजपकडूनही लपवाछपवी चालली आहे. सरकार नेतृत्वहीन बनले आहे, असा आरोप नायक यांनी केला. पत्रकार परिषदेस पक्षाचे पदाधिकारी विजय पै उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा