शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गोव्याच्या पर्यटनाला ‘ओखी’ वादळाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 13:54 IST

ओखी वादळाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. किना-यांवर पर्यटकांना पहुडण्यासाठी घातलेले पलंग वाहून गेल्याने तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने गेले दोन दिवस शॅक बंद आहेत.

पणजी : ओखी वादळाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. किना-यांवर पर्यटकांना पहुडण्यासाठी घातलेले पलंग वाहून गेल्याने तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने गेले दोन दिवस शॅक बंद आहेत. शॅक व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे. राज्यात ठिकठिकाणच्या किना-यांवर मिळून सुमारे ३५0 हून अधिक शॅक आहेत. अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार शॅकमध्ये पाणी शिरल्यानंतर विदेशी पाहुणे हॉटेलमध्ये परतले ते काही पुन: आलेच नाहीत. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात मोठ्या संख्येने देश-विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात.

पर्यटन व्यावसायिकांना अर्थार्जनासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. किना-यांवरील शॅक हे पर्यटकांचे मोठे आकर्षण असते. शॅकमध्ये पाणी शिरल्याने स्थिती मोठे नुकसान झाले असून पाणी सध्या ओसरले तरी डागडुजी व इतर गोष्टींसाठी काही कालावधी लागेल. दक्षिण गोव्यातील मोबोर, उत्तर गोव्यातील मोरजी किना-याला सर्वाधिक झळ पोचली. शिवाय बागा, कळंगुट, हणजुण किना-यांवरील शॅकमध्येही पाणी शिरले. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कार्दोझ यांचा कळंगुटमध्ये शॅक असून समुद्राचे पाणी शॅकमध्ये शिरल्याने पलंग हटवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. 

पर्यटन खात्याने किना-यांवरील स्थितीवर नजर ठेवली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर मुंबईच्या दृष्टी लाइफ सेविंग कंपनीचे ६00 हून अधिक जीवरक्षक तैनात असतात. समुद्रात कोणी बुडत असल्यास त्या व्यक्तिला वाचविण्याचे काम हे जीवरक्षक करीत असतात. राज्यातील सर्व किनारे, धबधबे, मयें येथील तलाव आदी ठिकाणी जीवरक्षक तैनात केलेले आहेत. पर्यटकांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन दृष्टी लाइफ सेविंग कंपनीच्या अधिकाºयांनी केले आहे. पाळोळें किना-यावर रविवारी दोन आयरिश महिलांना बुडताना वाचविण्यात आले.दरम्यान, पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार केळशी, मोबोर व मोरजी किना-याला जास्त फटका बसला आहे. वादळात नुकसान झाल्यास मामलेदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आढावा घेऊन नुकसान भरपाई ठरवितात. गेले तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटन खात्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. खात्याचे अधिकारी तसेच दृष्टी लाइफ सेविंगचे जीवरक्षक किना-यावर लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन