शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

गोव्यातील महामार्ग कामातील अडथळ्यांबाबत नितीन गडकरी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 19:27 IST

राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली.

पणजी : राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्यासह काही अभियंत्यांना गडकरी यांनी फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री गडकरी यांनी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी बैठक घेतली. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाशीसंबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. गोव्यातील बांधकाम खात्याचे अभियंतेही उपस्थित होते. देशभरातील सातशे प्रकल्पांच्या कामाचा आढावा यावेळी घेतला गेला.गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या रुंदीकरणाला काही आमदार व काही लोक विरोध करत आहेत. यामुळे अडथळे येत आहेत. या शिवायही काही प्रक्रिया जेवढय़ा वेगात व्हायला हव्यात तेवढ्या वेगाने त्या झालेल्या नाहीत, यामुळे मंत्री गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली. पर्वरी, वास्कोतील कामांबाबत गडकरी यांनी प्रधान मुख्य अभियंते पार्सेकर यांना बरेच प्रश्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने बैठकीनंतर जे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे, त्यातही गडकरी यांच्या नाराजीचा उल्लेख करण्यात आला आहे.राज्यात सध्या पत्रदेवी ते करासवाडा हे 634.32 कोटी रुपयांचे काम सुरू आहे. करासवाडा ते बांबोळी हे 852.67 कोटींचे काम सुरू आहे. ढवळी बायपास-71.95 कोटी, खांडेपार पुल-355.44 कोटी, मडगाव पश्चिम बायपास- 274.01 कोटी, काणकोण बायपास- 290.59 कोटी, जुवारी पुल सुमारे अडिच हजार कोटी अशा प्रकारे राज्यात कामे सुरू आहेत. मात्र काही कामे वेळेत होत नसल्याने व काही कामांचा वेग संथ असल्याने गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.देशभरातील एकूण 70 प्रकल्पांपैकी 30 प्रकल्पांचे काम मार्च 2019 पूर्वी पूर्ण होणार आहे. मंत्री गडकरी यांनी प्रत्येक प्रकल्पाच्या कामाचे बारकाईने विश्लेषण केले. 27 हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जे 2015 पूर्वी देण्यात आले आहे, त्याही विकासकांना तथा कंत्रटदार कंपन्यांना काम मार्च 2019 पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रलयाने 2018 हे साल बांधकाम वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना गडकरी यांनी सर्व संबंधितांना केल्या.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीroad transportरस्ते वाहतूकgoaगोवाhighwayमहामार्ग