शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

गोव्यातील महामार्ग कामातील अडथळ्यांबाबत नितीन गडकरी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 19:27 IST

राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली.

पणजी : राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्यासह काही अभियंत्यांना गडकरी यांनी फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री गडकरी यांनी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी बैठक घेतली. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाशीसंबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. गोव्यातील बांधकाम खात्याचे अभियंतेही उपस्थित होते. देशभरातील सातशे प्रकल्पांच्या कामाचा आढावा यावेळी घेतला गेला.गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या रुंदीकरणाला काही आमदार व काही लोक विरोध करत आहेत. यामुळे अडथळे येत आहेत. या शिवायही काही प्रक्रिया जेवढय़ा वेगात व्हायला हव्यात तेवढ्या वेगाने त्या झालेल्या नाहीत, यामुळे मंत्री गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली. पर्वरी, वास्कोतील कामांबाबत गडकरी यांनी प्रधान मुख्य अभियंते पार्सेकर यांना बरेच प्रश्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने बैठकीनंतर जे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे, त्यातही गडकरी यांच्या नाराजीचा उल्लेख करण्यात आला आहे.राज्यात सध्या पत्रदेवी ते करासवाडा हे 634.32 कोटी रुपयांचे काम सुरू आहे. करासवाडा ते बांबोळी हे 852.67 कोटींचे काम सुरू आहे. ढवळी बायपास-71.95 कोटी, खांडेपार पुल-355.44 कोटी, मडगाव पश्चिम बायपास- 274.01 कोटी, काणकोण बायपास- 290.59 कोटी, जुवारी पुल सुमारे अडिच हजार कोटी अशा प्रकारे राज्यात कामे सुरू आहेत. मात्र काही कामे वेळेत होत नसल्याने व काही कामांचा वेग संथ असल्याने गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.देशभरातील एकूण 70 प्रकल्पांपैकी 30 प्रकल्पांचे काम मार्च 2019 पूर्वी पूर्ण होणार आहे. मंत्री गडकरी यांनी प्रत्येक प्रकल्पाच्या कामाचे बारकाईने विश्लेषण केले. 27 हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जे 2015 पूर्वी देण्यात आले आहे, त्याही विकासकांना तथा कंत्रटदार कंपन्यांना काम मार्च 2019 पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रलयाने 2018 हे साल बांधकाम वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना गडकरी यांनी सर्व संबंधितांना केल्या.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीroad transportरस्ते वाहतूकgoaगोवाhighwayमहामार्ग