शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

नऊ वर्षे अकार्यक्षमताच सिद्ध; संजय निरुपम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 10:54 IST

महागाई वाढवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रातील सरकार 'अपयश', 'असंवेदनशील' आणि 'अकार्यक्षम ' असल्याचे मागील ९ वर्षांत सिद्ध झाले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या भूमीचे रक्षण करण्यात अपयश का आले, असा सवाल त्यांनी केला.

शनिवारी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लस फेरेरा आदी उपस्थित होते.

निरुपम म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ९ वर्षांत महागाई आणि बेरोजगारी कमीच होताना दिसत नाही. उलट आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. सरकारने जनतेची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी यावेळी केला.

नऊ वर्षांपूर्वी एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे दरही दुप्पट झाले आहेत. खाद्यतेल आणि इतर अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सरकार अनुदान आणि इतर मदत देण्यास अपयशी ठरल्याने शेती कामाचा दररोज वाढत आहे, असे सांगून निरुपम म्हणाले, काळा पैसा परत आणण्याचे विसरा, उलट ६८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या फरारांना या सरकारने संरक्षण दिले आहे, असे ते म्हणाले.

हे सरकार फक्त श्रीमंतांसाठीच राबणारे

'हे सरकार गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठीच राबणारे आहे. देशाची आर्थिक बाजू सांभाळण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते गरीब लोकांना मदत करू शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही. भाजपने केवळ भांडवलदारांना मदत केली आहे, असा आरोपही काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपम