शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

नऊ वर्षे अकार्यक्षमताच सिद्ध; संजय निरुपम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 10:54 IST

महागाई वाढवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रातील सरकार 'अपयश', 'असंवेदनशील' आणि 'अकार्यक्षम ' असल्याचे मागील ९ वर्षांत सिद्ध झाले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या भूमीचे रक्षण करण्यात अपयश का आले, असा सवाल त्यांनी केला.

शनिवारी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लस फेरेरा आदी उपस्थित होते.

निरुपम म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ९ वर्षांत महागाई आणि बेरोजगारी कमीच होताना दिसत नाही. उलट आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. सरकारने जनतेची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी यावेळी केला.

नऊ वर्षांपूर्वी एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे दरही दुप्पट झाले आहेत. खाद्यतेल आणि इतर अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सरकार अनुदान आणि इतर मदत देण्यास अपयशी ठरल्याने शेती कामाचा दररोज वाढत आहे, असे सांगून निरुपम म्हणाले, काळा पैसा परत आणण्याचे विसरा, उलट ६८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या फरारांना या सरकारने संरक्षण दिले आहे, असे ते म्हणाले.

हे सरकार फक्त श्रीमंतांसाठीच राबणारे

'हे सरकार गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठीच राबणारे आहे. देशाची आर्थिक बाजू सांभाळण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते गरीब लोकांना मदत करू शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही. भाजपने केवळ भांडवलदारांना मदत केली आहे, असा आरोपही काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपम