शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षे अकार्यक्षमताच सिद्ध; संजय निरुपम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 10:54 IST

महागाई वाढवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रातील सरकार 'अपयश', 'असंवेदनशील' आणि 'अकार्यक्षम ' असल्याचे मागील ९ वर्षांत सिद्ध झाले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या भूमीचे रक्षण करण्यात अपयश का आले, असा सवाल त्यांनी केला.

शनिवारी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लस फेरेरा आदी उपस्थित होते.

निरुपम म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ९ वर्षांत महागाई आणि बेरोजगारी कमीच होताना दिसत नाही. उलट आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. सरकारने जनतेची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी यावेळी केला.

नऊ वर्षांपूर्वी एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे दरही दुप्पट झाले आहेत. खाद्यतेल आणि इतर अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सरकार अनुदान आणि इतर मदत देण्यास अपयशी ठरल्याने शेती कामाचा दररोज वाढत आहे, असे सांगून निरुपम म्हणाले, काळा पैसा परत आणण्याचे विसरा, उलट ६८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या फरारांना या सरकारने संरक्षण दिले आहे, असे ते म्हणाले.

हे सरकार फक्त श्रीमंतांसाठीच राबणारे

'हे सरकार गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठीच राबणारे आहे. देशाची आर्थिक बाजू सांभाळण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते गरीब लोकांना मदत करू शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही. भाजपने केवळ भांडवलदारांना मदत केली आहे, असा आरोपही काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपम