शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नऊ वर्षे अकार्यक्षमताच सिद्ध; संजय निरुपम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 10:54 IST

महागाई वाढवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रातील सरकार 'अपयश', 'असंवेदनशील' आणि 'अकार्यक्षम ' असल्याचे मागील ९ वर्षांत सिद्ध झाले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या भूमीचे रक्षण करण्यात अपयश का आले, असा सवाल त्यांनी केला.

शनिवारी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लस फेरेरा आदी उपस्थित होते.

निरुपम म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ९ वर्षांत महागाई आणि बेरोजगारी कमीच होताना दिसत नाही. उलट आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. सरकारने जनतेची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी यावेळी केला.

नऊ वर्षांपूर्वी एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे दरही दुप्पट झाले आहेत. खाद्यतेल आणि इतर अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सरकार अनुदान आणि इतर मदत देण्यास अपयशी ठरल्याने शेती कामाचा दररोज वाढत आहे, असे सांगून निरुपम म्हणाले, काळा पैसा परत आणण्याचे विसरा, उलट ६८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या फरारांना या सरकारने संरक्षण दिले आहे, असे ते म्हणाले.

हे सरकार फक्त श्रीमंतांसाठीच राबणारे

'हे सरकार गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठीच राबणारे आहे. देशाची आर्थिक बाजू सांभाळण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते गरीब लोकांना मदत करू शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही. भाजपने केवळ भांडवलदारांना मदत केली आहे, असा आरोपही काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपम