शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्ट्रवादीसोबत युती ही काळाची गरज - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 13:40 IST

कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असणे ही काळाची गरज आहे - सुशीलकुमार शिंदे भाजपाच्या काही नेत्यांना अलिकडे वारंवार फ्रान्सला जावे लागत आहे. त्यामागील कारणोही कालांतराने उघड होतील.प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा धरू नये असे त्यांनी गोव्यातील काही छोट्या पक्षांच्या संदर्भात नमूद केले.

पणजी - कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पवारही तयार असतीलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेसने युती करण्याविषयी त्याचा काही परिणाम होत नाही. महाराष्ट्रात आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असणे ही काळाची गरज आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी लोकमतला सांगितले. 

शिंदे हे एका सोहळ्यानिमित्त गोव्यात आलेले आहेत. पणजीत लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली व राजकीय विषयांबाबत काही प्रश्न विचारले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सॅक्युलर असून त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रातील गावांमध्ये आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असणे हे त्यामुळे गरजेचे ठरते, असे शिंदे म्हणाले. राफेल घोटाळा बोफोर्सप्रमाणे कशाला गाजू शकला नाही असे विचारताच शिंदे म्हणाले, की राफेल हा फार मोठा घोटाळा आहे हे लोकांना कळून आले आहे. मात्र समाजाच्या तळागाळापर्यंत हा विषय पोहचविण्याबाबत आम्ही कमी पडलो असाही त्याचा अर्थ होतो. यापुढे तो विषय सर्वत्र पोहचेल. भाजपाच्या काही नेत्यांना अलिकडे वारंवार फ्रान्सला जावे लागत आहे. त्यामागील कारणोही कालांतराने उघड होतील.

गोव्यातील राजकारणाविषयी बोलताना शिंदे म्हणाले, की गोव्यात जर सगळे संघटीत राहिले तर निश्चितच येथे सत्ताबदल होईल. प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा धरू नये असे त्यांनी गोव्यातील काही छोट्या पक्षांच्या संदर्भात नमूद केले. 2007 साली दिगंबर कामत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री बनावे अशी शिफारस मी केली होती. कारण कामत यांचे वीजमंत्री म्हणून मी काम पाहिले होते. बाकी त्यांचे नाव सूचविण्यामागे माझा अन्य काही हेतू नव्हता. गोव्यात सध्या प्रशासन नावाची गोष्टच अस्तित्वात नाही व हे सगळे कसे काय एवढे महिने चाललेय तेच कळत नाही. सरकारमधील घटक पक्ष भाजपासोबत जाऊन फसलेत.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेgoaगोवाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा