शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

राष्ट्रवादीसोबत युती ही काळाची गरज - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 13:40 IST

कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असणे ही काळाची गरज आहे - सुशीलकुमार शिंदे भाजपाच्या काही नेत्यांना अलिकडे वारंवार फ्रान्सला जावे लागत आहे. त्यामागील कारणोही कालांतराने उघड होतील.प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा धरू नये असे त्यांनी गोव्यातील काही छोट्या पक्षांच्या संदर्भात नमूद केले.

पणजी - कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पवारही तयार असतीलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेसने युती करण्याविषयी त्याचा काही परिणाम होत नाही. महाराष्ट्रात आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असणे ही काळाची गरज आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी लोकमतला सांगितले. 

शिंदे हे एका सोहळ्यानिमित्त गोव्यात आलेले आहेत. पणजीत लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली व राजकीय विषयांबाबत काही प्रश्न विचारले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सॅक्युलर असून त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रातील गावांमध्ये आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असणे हे त्यामुळे गरजेचे ठरते, असे शिंदे म्हणाले. राफेल घोटाळा बोफोर्सप्रमाणे कशाला गाजू शकला नाही असे विचारताच शिंदे म्हणाले, की राफेल हा फार मोठा घोटाळा आहे हे लोकांना कळून आले आहे. मात्र समाजाच्या तळागाळापर्यंत हा विषय पोहचविण्याबाबत आम्ही कमी पडलो असाही त्याचा अर्थ होतो. यापुढे तो विषय सर्वत्र पोहचेल. भाजपाच्या काही नेत्यांना अलिकडे वारंवार फ्रान्सला जावे लागत आहे. त्यामागील कारणोही कालांतराने उघड होतील.

गोव्यातील राजकारणाविषयी बोलताना शिंदे म्हणाले, की गोव्यात जर सगळे संघटीत राहिले तर निश्चितच येथे सत्ताबदल होईल. प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा धरू नये असे त्यांनी गोव्यातील काही छोट्या पक्षांच्या संदर्भात नमूद केले. 2007 साली दिगंबर कामत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री बनावे अशी शिफारस मी केली होती. कारण कामत यांचे वीजमंत्री म्हणून मी काम पाहिले होते. बाकी त्यांचे नाव सूचविण्यामागे माझा अन्य काही हेतू नव्हता. गोव्यात सध्या प्रशासन नावाची गोष्टच अस्तित्वात नाही व हे सगळे कसे काय एवढे महिने चाललेय तेच कळत नाही. सरकारमधील घटक पक्ष भाजपासोबत जाऊन फसलेत.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेgoaगोवाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा