शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीसोबत युती ही काळाची गरज - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 13:40 IST

कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असणे ही काळाची गरज आहे - सुशीलकुमार शिंदे भाजपाच्या काही नेत्यांना अलिकडे वारंवार फ्रान्सला जावे लागत आहे. त्यामागील कारणोही कालांतराने उघड होतील.प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा धरू नये असे त्यांनी गोव्यातील काही छोट्या पक्षांच्या संदर्भात नमूद केले.

पणजी - कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पवारही तयार असतीलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेसने युती करण्याविषयी त्याचा काही परिणाम होत नाही. महाराष्ट्रात आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असणे ही काळाची गरज आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी लोकमतला सांगितले. 

शिंदे हे एका सोहळ्यानिमित्त गोव्यात आलेले आहेत. पणजीत लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली व राजकीय विषयांबाबत काही प्रश्न विचारले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सॅक्युलर असून त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रातील गावांमध्ये आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असणे हे त्यामुळे गरजेचे ठरते, असे शिंदे म्हणाले. राफेल घोटाळा बोफोर्सप्रमाणे कशाला गाजू शकला नाही असे विचारताच शिंदे म्हणाले, की राफेल हा फार मोठा घोटाळा आहे हे लोकांना कळून आले आहे. मात्र समाजाच्या तळागाळापर्यंत हा विषय पोहचविण्याबाबत आम्ही कमी पडलो असाही त्याचा अर्थ होतो. यापुढे तो विषय सर्वत्र पोहचेल. भाजपाच्या काही नेत्यांना अलिकडे वारंवार फ्रान्सला जावे लागत आहे. त्यामागील कारणोही कालांतराने उघड होतील.

गोव्यातील राजकारणाविषयी बोलताना शिंदे म्हणाले, की गोव्यात जर सगळे संघटीत राहिले तर निश्चितच येथे सत्ताबदल होईल. प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा धरू नये असे त्यांनी गोव्यातील काही छोट्या पक्षांच्या संदर्भात नमूद केले. 2007 साली दिगंबर कामत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री बनावे अशी शिफारस मी केली होती. कारण कामत यांचे वीजमंत्री म्हणून मी काम पाहिले होते. बाकी त्यांचे नाव सूचविण्यामागे माझा अन्य काही हेतू नव्हता. गोव्यात सध्या प्रशासन नावाची गोष्टच अस्तित्वात नाही व हे सगळे कसे काय एवढे महिने चाललेय तेच कळत नाही. सरकारमधील घटक पक्ष भाजपासोबत जाऊन फसलेत.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेgoaगोवाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा