शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा आटापिटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 12:47 IST

मंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचे प्रयत्न सुरू

पणजी : गोव्यात सत्ता बदलासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार असलेल्या चर्चिल आलेमाव यांनी आटापिटा चालवला आहे. आलेमाव यांना मंत्रीपद मिळवण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीनं अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करावी, यासाठी आलेमाव यांचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यात सात वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार अधिकारावर होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यावेळी तीन आमदार होते. मात्र 2017 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली. चर्चिल आलेमवा यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यानं त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळवलं आणि ते दक्षिण गोव्यातील बाणावली मतदारसंघातून निवडून आले. आपली कामे व्हायला हवीत म्हणून आलेमाव यांनी कायम मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडी सरकारला अप्रत्यक्षरित्या साथ दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसपासून अंतर राखलं होतं. पण सध्या भाजपच्या सरकारला घरघर लागल्यासारखी स्थिती असल्यानं आलेमाव यांनी वेगळी भूमिका घेत काँग्रेसच्या नेत्यांसोबत हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारी असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे गोवा विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही अशी काँग्रेसच्या आमदारांसह आलेमाव यांचीही भावना आहे. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्रीदेखील रुग्णालयातच आहेत. आलेमाव हे सत्तेसाठी कोणताही मार्ग पत्करण्यासाठी गोव्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी सध्या भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील विविध घटक पक्ष व अपक्षांना संपर्क साधण्याची खेळी चालवली आहे. काँग्रेसकडे स्वत:चे सोळा आमदार आहेत. सरकारमधील एक जरी घटक पक्ष फुटला व काँग्रेसला येऊन मिळाला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. त्यामुळेच आलेमाव हे सध्या सत्ता बदलासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, आलेमाव यांनी याविषयी कुठेही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचं काहीही ऐकणार नाही. फक्त पवार साहेबांचं ऐकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर