शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

... तर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल; सुदिन ढवळीकरांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:53 IST

आपण म्हादईचा प्रश्नही राज्यपालांसमोर मांडला. म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवतेय व त्यामुळे हे पाणी आटेल व गोव्याला परिणाम भोगावे लागतील असे आपण यापूर्वी म्हणालो होतो

पणजी : राज्य आर्थिकदृष्टय़ा खूप अडचणीत आहे व खर्च कपातीसाठी व्यापक व कडक उपाययोजना करणो गरजेचे बनले आहे. जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खर्च कपातीवर भर दिला नाही तर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल. गोव्याची वाटचाल त्याच दिशेने होईल असा इशारा मगोपचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे दिला.

ढवळीकर म्हणाले, की आपण राज्यपाल सत्यपाल मलिक यांना कालच भेटलो. राज्यपाल चांगले काम करतात. त्यांना आमचा कायम पाठींबा असेल. सरकारने कोविद संकट काळात खर्चात खूप कपात करण्याची गरज आहे ही गोष्ट आपण राज्यपालांसमोर मांडली. राज्यपालांनी खनिज खाण धंदाही सुरू व्हावा म्हणून पुढाकार घेतला आहे. आपण म्हादईचा प्रश्नही राज्यपालांसमोर मांडला. म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवतेय व त्यामुळे हे पाणी आटेल व गोव्याला परिणाम भोगावे लागतील असे आपण यापूर्वी म्हणालो होतो व पंतप्रधानांना पत्रही पाठवले होते. त्याच पत्रची प्रत मी राज्यपालांना दिली व वाठादेव- साखळी येथे म्हादई नदीच्या प्रवाहात आता एक फूट देखील पाणी राहिलेले नाही ही गोष्ट आपण राज्यपालांच्या नजरेस आणून दिली. राज्यपालांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे. 

अधिवेशन बोलवा-

ढवळीकर म्हणाले, की मंत्री वगैरे 30 लाखांची कारगाडी खरेदी करू शकतात असे परिपत्रक नुकतेच अर्थ खात्याने काढले. पणजी महापालिकेने तर नवी महागडी कार खरेदीही केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या कार खरेदीविषयी काही माहिती नव्हते की त्यांना महापालिकेने मुद्दाम अंधारात ठेवले ते त्यांनीच सांगावे. खर्च कपातीच्या विषयावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलवावे. त्यात सर्व माजी मुख्यमंत्री व जाणकार आमदारांना बोलू द्या. सर्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी ऐकाव्यात. केवळ एक समिती नेमली म्हणून होणार नाही. जर खर्च कपात झाली नाही तर राज्य पूर्ण आर्थिक कोंडीत सापडेल व राष्ट्रपती राजवट येईल. सर्व मंत्री- आमदारांना घरी जावे लागेल. मग आमदारांकडे महामंडळेही राहणार नाहीत. 

राज्यात येत्या 15 मेनंतर मोठी पाणी टंचाई निर्माण होईल. ओपाचे सध्याची पाणी पातळी बांधकाम खाते त्यावेळी कायम राखूच शकणार नाही. म्हादई नदीतील पाणी ज्या वाठादेव येथे पूर्ण आटले, त्या जागेपासून मुख्यमंत्री सावंत यांचे निवासस्थान केवळ पाच किलोमीटरवर आहे. वाठादेवला फक्त एक पाऊल बुडेल एवढीच सध्या पाण्याची पातळी आहे. सध्या गोव्यात पर्यटक नसल्याने ओपाला पाण्याची पातळी योग्य आहे पण एकदा पर्यटन धंदा सुरू झाल्यानंतर वस्तूस्थिती उघड होईल, असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतcorona virusकोरोना वायरस बातम्या