शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

जेटींवरून खनिज वाहतूक सुरू, सल्लागार समितीने घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 9:58 PM

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जेटींवरून (रॉयल्टी भरलेल्या) खनिजाची वाहतूक काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. तत्पूर्वी तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेतला व अशा प्रकारे खनिज वाहतूक करण्यासाठी जेटी खुल्या करण्याची सूचना शासकीय यंत्रणेला केली.

पणजी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जेटींवरून (रॉयल्टी भरलेल्या) खनिजाची वाहतूक काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. तत्पूर्वी तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेतला व अशा प्रकारे खनिज वाहतूक करण्यासाठी जेटी खुल्या करण्याची सूचना शासकीय यंत्रणेला केली.वेदांता, फोमेन्तो ह्या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करून रॉयल्टी भरलेल्या मालाची बाजर्द्वारे वाहतूक करू दिली जावी,  अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने दि. 15 मार्चला किंवा तत्पूर्वी ज्या मालाची रॉयल्टी भरली गेली व जो माल जेटींवर आहे, त्याची वाहतूक करण्यास परवानगी दिली. म्हणजेच हा खनिज माल जेटींवरून बंदरावर आणि तिथून जहाजासाठी निर्यातीसाठी नेता येतो. तशा प्रकारचीच चर्चा गोवा मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीतही गुरुवारी झाली. लिज क्षेत्रबाहेर अन्य कुठेही ठेवलेल्या खनिज मालाची वाहतूक करता येत नाही. अशा मालासाठी अगोदर रॉयल्र्टी भरलेली असली तरी, त्याची वाहतूक करणो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शक्य नाही. मात्र वजन माप काटय़ाच्या पुढे जो खनिज माल गेलेला आहे, त्या खनिज मालाची वाहतूक करण्यास तीन मंत्र्यांच्या समितीने मंजुरी दिल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला त्याविषयी प्रतिज्ञापत्रद्वारे कळविले जाईल किंवा खंडपीठाकडून त्याविषयी स्पष्टीकरण घेतले जाईल, असेही एका मंत्र्याने लोकमतला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने फक्त जेटींवरील मालाचीच वाहतूक करता येते असे म्हटलेले आहे पण हायकोर्टाकडून अॅडव्हकेट जनरल सा:या शंकांचे निरसन करून घेतील, असे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले.

हरवळेत पुन्हा पाणी शक्य काही खनिज कंपन्या खाणींच्या खंदकातील पाणी उसपत नसल्याने हरवळे येथील धबधबा सुकल्याचा विषय सरकारने गंभीरपणो घेतला. साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांच्या उपस्थितीत साखळी मतदारसंघातील काही खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीवेळी खनिज व्यवसायिकांनी खंदकातील पाणी काढावे अशा सूचना दिल्या गेल्या. तसेच जलसंसाधन खाते आपले आणखी दोन पंप बसवून पाणी काढणार आहे. एक पंप खात्याने बसवला आहे. हे पाणी कुळागरे व शेतांसाठी सोडले जाईल. शिवाय हरवळेच्या धबधब्यातही पुन्हा पाणी येण्यास हे प्रयत्न मदतरुप ठरतील.

टॅग्स :goaगोवा