शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

काँग्रेसच्या निष्ठेच्या गोष्टी; इच्छूक उमेदवारांच्या धाडसाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2024 10:26 IST

निष्ठेच्या गोष्टी आता चक्क काँग्रेसचे आमदार सांगू लागले आहेत.

निष्ठेच्या गोष्टी आता चक्क काँग्रेसचे आमदार सांगू लागले आहेत. देवासमोर शपथ घेणारेही खूप निष्ठावान होते, पणजीतील मंदिरात आणि बांबोळीच्या खुर्सासमोर उभे राहून मायकल लोबो, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर वगैरे अनेकांनी गोंयकारांना शब्द दिला होता. सगळ्यांनी भाजपमध्ये उडी टाकली. जे भाजपमध्ये गेले नाहीत, त्यांच्याविषयी अधूनमधून अफवा पिकतात. आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. अशावेळी काँग्रेसने व काँग्रेसच्या आमदारांनी निष्ठेच्या गोष्टी सांगायलाच हव्यात. मात्र, त्याचबरोबर मतदारांकडे मते मागायला जाताना काँग्रेस पक्षाला आपले आमदार पक्ष सोडून का जातात तेही लोकांना नव्याने सांगावे लागेल. पूर्वी काही प्रदेशाध्यक्ष अशा फुटींबाबत माफी वगैरे मागायचे, आता माफी मागण्याची गरज नाही. मात्र, निदान फुटिरांना पुन्हा कधी काँग्रेस पक्ष आपल्या पक्षात फेरप्रवेश देणार नाही, हे तरी जाहीर करावे लागेल.

हळदोण्याचे आमदार कार्लस फरैरा हे काल पक्षनिष्ठेविषयी बोलले. कार्ल्सचे विधानसभेतील काम प्रभावी आहे. कायद्याचा चांगला अभ्यास असल्याने ते विधानसभा अधिवेशनात मुद्देसूद बोलतात, कार्लस काल म्हणाले, मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. तसेच मला पूर्ण विश्वास आहे, माझे अन्य दोन आमदारदेखील काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ आहेत. कार्लसचे हे विधान तसे मजेशीर आहे. अर्थात कार्ल्सच्या निष्ठेविषयी शंका नाही. मात्र, इतर आमदारांच्या निष्ठेविषयी ते का बरे बोलतात, असा प्रश्न लोकांना पडेलच. आजच्या राजकारणात आपण दुसऱ्याविषयी अत्यंत विश्वासाने व खात्रीने बोलू शकतो का? 

राहुल गांधीदेखील कधी कोणत्याच काँग्रेस आमदाराविषयी खात्रीने कुठे बोलत नाहीत, कार्ल्सना भाजपची आता ऑफर नाही, भाजपमध्ये आता अन्य आयात आमदारांना देण्यासाठीही काही नाही. बिचारे जे आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर्षी आले, त्यांच्यापैकी काहीजण सैरभैर होऊन फिरतात. मुख्यमंत्री सावंत यांनी आम्हाला काहीच दिले नाही, मोठे महामंडळ नाही व मंत्रिपदही नाही, असे काही आमदार सांगतात. फक्त सांताक्रूझचे रुदोल्फ तेवढे खुश आहेत. कारण रुदोल्फना एकट्यालाच काँग्रेस सोडून जाताना मोठे बक्षीस मिळाले होते.

काँग्रेसचे आठ आमदार एकत्र फुटले होते तेव्हा हळदोणेच्या आमदारालाही भाजपची ऑफर होती. नुवेचे आलेक्स सिक्वेरा फुटण्यापूर्वी कार्नुस यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. कदाचित कार्लस कायदा मंत्रीही झाले असते, पण कार्लस भाजपमध्ये गेले नाहीत. याबाबत कार्लसचे कौतुक करावे लागेल. कार्ल्सने म्हापशात काँग्रेस कार्यकर्त्यांना निष्ठेच्या चार गोष्टी सांगितल्या हे तसे चुकीचे नाही; पण काही कार्यकर्तेही आता पक्ष निष्ठेशी आपले काही नाते ठेवत नसतात. 

आमदार दुसऱ्या पक्षात गेला की त्याचे कार्यकर्ते व काही पदाधिकारीही दुसन्या पक्षात उडी टाकतात. सध्या रामभक्तीची लाट देशात आहेच, राम एकनिष्ठ होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते, काँग्रेसचेही काही नेते सध्या रामभक्त बनलेत, रमाकांत खलपदेखील रामभक्तीच्याच गोष्टी काहीवेळा सोशल मीडियावरून शेअर करतात, शुभेच्छा देतात. खलपांनाही कदाचित रामांचा एकनिष्ठ हा गुण आवडला असेल, तर विषय होता कार्लस फरैरांचा, कार्लस कधी काँग्रेस सोडणार नाही हे लोकांना पटते. वास्तविक काँग्रेसने तिकीट दिल्यानेच कार्लस आमदार होऊ शकले, हेदेखील लक्षात घ्यावे लागेल. कार्लस यांची इमेजपूर्वी भाटकार अशी होती. आता ती तशी नाही, त्यांना राजकीय नेत्यांप्रमाणेच लोकांमध्ये कायम मिसळावे लागेल. सध्या काँग्रेसचे काही पदाधिकारी लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाच्या स्पर्धेत आहेत. विजय भिके, राजन घाटे वगैरे लोकसभा निवडणुकीचे तिकीट मागतात, खलपांनीही तिकिटावर दावा केला आहे. 

काँग्रेसच्या सर्वच इच्छुक उमेदवारांच्या धाडसाचे मात्र कौतुक करावे लागेल. प्रत्येकाला वाटतेय की, आपण उत्तर गोव्यात जिंकणारच. पंचवीस वर्षे उत्तरेत भाजप जिंकत आला तरी आता मात्र काँग्रेस पक्ष इतिहास घडवील असे भिके, घाटे वगैरेंना वाटते हे आजच्या काळात मोठ्या धाडसाचे नव्हे काय? कार्लसने युरी आलेमाव व एल्टन यांच्या निष्ठेवरही खूप विश्वास ठेवला आहे. एल्टनना मध्यंतरी भाजपवाल्यांच्या ऑफर्स यायच्या; पण विजय सरदेसाई यांनी एल्टनना कधी कुठे जाऊ दिले नाही. शिवाय सरकारमधील एका राजकारण्यानेही एल्टनना रोखले होते. असो. तूर्त काँग्रेसचे तिन्ही आमदार पक्षावर निष्ठा ठेवून आहेत हेही नसे थोडके. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस