शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 14:49 IST

म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत.

ठळक मुद्देम्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. पर्रा येथील या कलिंगडांशी जणू त्यांचे भावनिक नाते होते.

पणजी - म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. पर्रा येथील या कलिंगडांशी जणू त्यांचे भावनिक नाते होते. जाहीर सभांमधील भाषणे असो किंवा विधानसभेतील, एकही त्यांचे भाषण असे नसेल की ज्यामध्ये या कलिंगडांचा उल्लेख झालेला नसेल.

कलिंगडाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्मृतीही त्यांनी अनेकदा भाषणातून जागवल्या. ते म्हणत असत की, लहान असताना कलिंगड खाण्यासाठी आम्ही शेतावर जायचो तेव्हा शेतकरी मोठे कलिंगड खाण्यासाठी मोफत देत असत पण त्यांची एक अट असे, ती म्हणजे कलिंगड खाल्यानंतर तोंडात ज्या बिया राहतात त्या बाजूला टोपलीत टाकायच्या. आम्ही तसे करत असू आणि शेतकरी या बियांचे संवर्धन करून नंतर पुढील मोसमात नवे पीक घेण्यासाठी त्या बिया वापरत असत. त्यामुळे नवे पीकही मोठ्या कलिंगडांचे मिळत असे परंतु अलीकडच्या काळात ही पद्धत बंद झाली. दिवसेंदिवस कलिंगड छोटी होत गेली आणि आता या कलिंगडांना पूर्वीची सर राहिलेली नाही, अशी खंत ते व्यक्त करीत असत.

मुंबईतही जपल्या स्मृती

पर्रीकर सांगायचे की, मी मुंबईत पवई येथे आयआयटीमध्ये शिकण्यासाठी गेलो. तेथे शिक्षण पूर्ण करून तब्बल साडे सहा वर्षांच्या कालखंडानंतर मी पर्रा येथे आलो तेव्हा पूर्वीसारखी कलिंगड दिसली नाहीत. बाजारात फिरलो परंतु ती कलिंगड गायब झालेली होती. शेतकरी आम्हाला बालपणात केवळ बियांसाठी मोफत कलिंगडे खाऊ घालीत होता. त्याचा पुत्र आता शेती करू लागला होता. बाजारात चांगला दर मिळत असल्याने त्याने मोठी कलिंगडे मुलांना मोफत खाऊ देणे बंद केले होते. त्यामुळे त्याला बियाही मिळणे बंद झाले आणि बाजारात छोटी कलिंगड येऊ लागली.

पर्रीकर म्हणत की, दर २५ वर्षानंतर पिढी बदलते. आज आम्ही ज्या चुका करत आहोत त्याचे परिणाम दोनशे वर्षानंतरही दिसू शकतात.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा