शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 2:32 PM

ज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे

- सद्गुरू पाटीलज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे, त्या काळात मनोहर पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्याचे काम सुरू केले होते. पंच म्हणून किंवा सरपंच म्हणून एखादा कार्यकर्ता जर निवडून आला तर, पर्रीकर त्याच्याकडे जाऊन त्या कार्यकर्त्याचे अभिनंदन करत असत. खूप प्रारंभी श्रीपाद नाईक हे एकटेच आडपईमध्ये भाजपचे सरपंच होते. नंतरच्या काळात सदानंद शेट तानावडे वगैरे भाजप कार्यकर्ते सरपंच बनले. तानावडे हे पीर्ण पंचायतीवर निवडून यायचे. तिथे ते सरपंचही झाले होते, त्या वेळी पर्रीकर यांच्याविषयी आलेला अनुभव तानावडे अनेकदा सांगतात. पर्रीकरांनी प्रारंभीच्या काळात कायम सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला व तो संपर्क वाढवत नेला. म्हणून ते पूर्ण गोव्याचे नेते बनले. पायाला चक्रे लावल्याप्रमाणे पर्रीकर कायम गोवाभर खेड्यापाड्यांत फिरले. काणकोण किंवा सांगेच्या टोकाला सकाळी कधीही भाजपचा किंवा सरकारी कार्यक्रम असो. पर्रीकर त्या कार्यक्रमाला पोहचायचेच व दिवसभर कामासाठी वेळ देऊन रात्री उशिरा घरी पोहचले तरी, दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी लवकर त्यांचे काम पुन्हा सुरू व्हायचे. फार दुर्मिळ असे हे गुण आहेत, असे तानावडे नमूद करतात.पर्रीकर त्या वेळी म्हणजे ९० च्या दशकात अनेकदा आमच्या घरी येत होते. आपले अभिनंदन करत असत. मी पंचायतीवर निवडून येतो, सरपंच होतो, याचे त्यांना त्या वेळी कौतुक वाटायचे. पर्रीकर यांनी भाजपमध्ये त्याकाळी मला प्रोत्साहन दिले. पर्रीकर एरव्ही कठोर दिसत असले तरी, ते काहीवेळा भावूकही व्हायचे व मी स्वत: तसा अनुभव घेतलेला आहे. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अचानक मला रात्रीच्यावेळी तिकीट जाहीर केले गेले होते. ती निवडणूक मी हरलो. मात्र, नंतरची निवडणूक मी जिंकलो व आमदार झालो. पर्रीकर यांचे मार्गदर्शन मला कायम लाभले. भाजपचा एखादा सोहळा जर आयोजित करायचा झाला तर, पर्रीकर छोट्या छोट्या व्यवस्थापनातही बारकाईने लक्ष घालतात व सोहळा यशस्वी व्हावा म्हणून प्रचंड कष्ट घेतात, असा अनुभव मला मी राज्यस्तरीय पदाधिकारी बनल्यानंतरही कायम आला. ते मुख्यमंत्री म्हणून काम करताना खूप व्यस्त असायचे; पण पक्षाचा एखादा कार्यक्रम, सभा, मेळावा आयोजित करत असताना ते अनेकदा आम्हाला फोन लावून तयारी कुठवर पोहचली आहे याची माहिती घ्यायचे. ते कामय पक्षाचाच विचार करायचे, असे तानावडे सांगतात.माझे लग्न ठरले तेव्हा बेळगावला लग्नाचे साहित्य आणण्यासाठी मला जायचे होते. मी तेव्हा साधा कार्यकर्ता होतो. तेव्हा भाजपमध्ये पर्रीकरांकडेच चारचाकी वाहन होते. मी बेळगावला जात असल्याचे पर्रीकरांना सांगितले व पर्रीकरांनी वाहन दिले. ते घेऊन मी लग्नाचे साहित्य घेऊन आलो होतो. त्याकाळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा प्रकारे पर्रीकर यांचा आधार वाटायचा, असे तानावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा