शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:12 IST

महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला.

गोवा - काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवारासमोर पराभूत झालेल्या नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. आम्ही पक्षप्रमुखांना या तक्रारी मांडल्या. राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार पडला. महाविकास आघाडीत राहून आमचा काय उपयोग होता? सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मग नेमंक काय झाले याची विचारणा पक्षप्रमुखांनी करायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठलेही सेलिब्रेशन आमच्या आमदारांनी केले नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

आमदार दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले. उद्धव ठाकरेंचे मन दुखवावे, अपमान व्हावा असा कुठलाही हेतू नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढताना स्वकीयांशीही लढावं लागले. आम्ही दीड वर्ष झाले आपली नैसर्गिक युती आहे. ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढलो त्यासोबत आपण राहावं ही आमची भूमिका होती. वेळोवेळी आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. संभ्रमावस्था निर्माण होईल अशी वक्तव्ये, बातम्या पसरवल्या गेल्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमदार एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेतले जात नाहीत. आमदारांमध्ये चलबिचल होईल यासाठी मंत्रिमंडळाची संभाव्य यादी पसरवली गेली. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आमच्या नेत्याशी आम्हाला अप्रत्यक्ष लढावं लागलं. आमची भूमिका विचारात न घेतल्याने हा संघर्ष निर्माण झाला. भाजपासोबत आमची मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा नाही. एकही आमदार मंत्रिपदाच्या आशेने आले नाहीत. जे आलेत त्यातील ६ विद्यमान मंत्री होते. बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार होता तो पुढे घेऊन जाण्यासाठी ते यात सहभागी झाले असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. 

कुणीही वाईट वाटून घेऊ नये कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा