शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:12 IST

महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला.

गोवा - काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवारासमोर पराभूत झालेल्या नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. आम्ही पक्षप्रमुखांना या तक्रारी मांडल्या. राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार पडला. महाविकास आघाडीत राहून आमचा काय उपयोग होता? सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मग नेमंक काय झाले याची विचारणा पक्षप्रमुखांनी करायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठलेही सेलिब्रेशन आमच्या आमदारांनी केले नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

आमदार दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले. उद्धव ठाकरेंचे मन दुखवावे, अपमान व्हावा असा कुठलाही हेतू नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढताना स्वकीयांशीही लढावं लागले. आम्ही दीड वर्ष झाले आपली नैसर्गिक युती आहे. ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढलो त्यासोबत आपण राहावं ही आमची भूमिका होती. वेळोवेळी आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. संभ्रमावस्था निर्माण होईल अशी वक्तव्ये, बातम्या पसरवल्या गेल्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमदार एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेतले जात नाहीत. आमदारांमध्ये चलबिचल होईल यासाठी मंत्रिमंडळाची संभाव्य यादी पसरवली गेली. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आमच्या नेत्याशी आम्हाला अप्रत्यक्ष लढावं लागलं. आमची भूमिका विचारात न घेतल्याने हा संघर्ष निर्माण झाला. भाजपासोबत आमची मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा नाही. एकही आमदार मंत्रिपदाच्या आशेने आले नाहीत. जे आलेत त्यातील ६ विद्यमान मंत्री होते. बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार होता तो पुढे घेऊन जाण्यासाठी ते यात सहभागी झाले असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. 

कुणीही वाईट वाटून घेऊ नये कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा