शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले भाजपाच्या समर्थनानेच, गोवा प्रदेश ‘आप’चा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 20:04 IST

देशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा व भाजपा सरकारचे या हल्ल्यांना समर्थन असल्याचा आरोप गोवा प्रदेश ‘आप’ने केला आहे.

ठळक मुद्देदेशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत महाराष्ट्रात दलितांवरील हल्ला मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा आरोपआम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक यांची साप्ताहिक बैठक

पणजी : देशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रात दलितांवरील हल्ला मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा व भाजपा सरकारचे या हल्ल्यांना समर्थन असल्याचा आरोप गोवा प्रदेश ‘आप’ने केला आहे.

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक यांची साप्ताहिक बैठक बुधवारी झाली. गोव्याच्या बाबतीत अनेक विषय चर्चेला आले. पक्षाचे प्रदेश सचिव प्रदीप पाडगांवकर प्रसिध्दी पत्रकात म्हणतात की, मनोहर पर्रीकर, विजय सरदेसाई व ढवळीकर यांच्या अभद्र युतीने राज्यातील सर्वसामान्यांचा आवाज दाबून टाकला आहे. पर्यावरणीय परवाने देताना प्रदूषणाचा विचारही केला जात नाही. कोळसा हाताळणीमुळे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. पक्षाचे प्रदेश निमंत्रक एल्विस गोम्स यांनीही याबाबत सरकारवर टीका करताना सरकार भांडवलदारांच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोप केला आहे. कोळसाविरोधी चळवळीतील कार्यकर्ते रुपेश शिंक्रे, सिध्दार्थ कारापूरकर, लुमिना आल्मेदा, सीता आंताव, माक्लीन कुतिन्हो यावेळी उपस्थित होते. 

कोळसा वाहतूक, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कसिनो या विषयांवर भाजपा आणि काँग्रेसकडून चाललेल्या आरोपसत्राचा समाचार घेताना गोम्स यांनी हे दोन्ही पक्ष गोव्याच्या अध:पतनास कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. मनोहर पर्रीकर यांनी गेल्या ६ वर्षात अनेक यु-टर्न घेतले. आता म्हादईच्या विषयावरही तेच चालले आहे, अशी टीका गोम्स यांनी केली आहे. 

नद्यांचे राष्ट्रीयीकरण व कोळसा हबला विरोध करणारे ठराव १00 ग्रामपंचायतींनी घेतल्यानंतर पंचायतींचे सचिव तसेच सरपंचांना ग्रामसभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे सरकारने दिलेले आदेशही निषेधार्ह असल्याचे गोम्स म्हणतात. मुक्तीनंतर ५६ वर्षातही राज्याची प्रगती होऊ शकलेली नाही. केपें, सांगे, काणकोणसारख्या तालुक्यांमध्ये अनुसूचित जमातींच्या लोकांना रस्ते, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा अजूनही मिळालेल्या नाहीत, अशी टीकाही करण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवाBhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदAAPआप