शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

म्हादईबाबत अमित शहा यांचे मौन अपराधीपणामुळेच,शिवसेनेचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 13:28 IST

शिवसेनेची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका.

पणजी : कर्नाटकमध्ये मतांच्या राजकारणासाठी म्हादई नदीचे पाणी सहा महिन्यात कर्नाटकला देण्याची घोषणा करणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी(14 मे) गोव्यातील कार्यकर्ता संमेलनात या विषयावर पाळलेले मौन त्यांची अपराधीपणाची भावना दर्शवते अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

पार्टीच्या उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक म्हणाल्या आहेत की, शाह यांनी आपल्या भाषणात म्हादईबद्दल एकही चकार शब्द न काढणे आश्चर्यकारक आहे. गोव्यासाठी म्हादईचा विषय महत्त्वपूर्ण असून शाह यांनी रविवारी त्यावर भाष्य करणं अपेक्षित होते. म्हादईच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रापासून कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपला सत्ता दिली तर सहा महिन्यात म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ याबाबत केलेल्या विधानापर्यंत शिवसेना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. शिवसेनेने वेळोवेळी गोव्याचे हित लक्षात घेऊन या कुटील कारस्थानाला विरोधदेखील दर्शवला आहे.

निवडणुका डोळ्यासमोर असल्याने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेला म्हादईच्या पाण्याबाबत दिलेले आश्वासन म्हणजे कर्नाटकच्या जनतेची निव्वळ फसवणूक आहे. भाजपाची तिच संस्कृती आहे. शिवसेनेची मागणी आहे की, या गंभीर विषयावर शाह यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करायला हवी.

म्हादईचे पाणी वळवण्यास भाजपाने परवानगी दिली तर गोव्यात लोक रस्त्यावर उतरतील आणि भाजपा आघाडीचे सरकार खाली खेचतील याची पूर्ण कल्पना भाजपाला आहे. अमित शहा यांच्या म्हादईवरील कालच्या मौनाने त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे हे दाखवून दिले आहे, असे राखी यांनी म्हटले आहे. 

पुढे त्या असंही म्हणाल्या आहेत की, राज्यात खाणी बंद झाल्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असतानादेखील शाह यांनी त्याची अपेक्षित दखल घेतली नाही. केवळ दोन वाक्यात त्यांनी या विषयावर जुजबी वक्तव्य करत कोर्टामार्फत तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील एवढेच बोलून गोमंतकीयांचा अपमान केला आहे. शाह यांनी खाणींबाबत केलेले वक्तव्य बघितले तर खाणींच्या प्रश्नावर भाजपा फारसा गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. ज्या पक्षाची केंद्रात आणि गोव्यात सत्ता आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला गोव्यातील महत्त्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी गोमंतकीय जनतेला आश्वस्त करावे असे वाटले नाही ही दु:खद बाब आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहShiv SenaशिवसेनाBJPभाजपा