शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

लोकमत इफेक्ट, मुख्यमंत्री पर्रिकरांनी तातडीने घेतली मंत्र्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 7:56 PM

मंत्रिमंडळातील एखाद्या  मंत्र्यांने आक्रमक भूमिका घेत  धमकी दिली तरी गोव्याच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होत नाही अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या  वृत्ताची गंभीर दखल घेतली व तातडीने शुक्रवारीच मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया मार्गी लावली.

 - सदगुरू पाटील

पणजी, दि. २२ -  मंत्रिमंडळातील एखाद्या  मंत्र्यांने आक्रमक भूमिका घेत  धमकी दिली तरी गोव्याच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होत नाही अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या  वृत्ताची गंभीर दखल घेतली व तातडीने शुक्रवारीच मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया मार्गी लावली.

आपल्या सालीगाव मतदारसंघातील नेरूल वगैरे भागात पाण्याचा पुरवठाच होत नाही अशी तक्रार गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी केली होती पण बांधकाम खात्याचे अभियंते लक्ष देईना. मंत्री साळगावकर यांनी शेवटी चिडून आपण यापुढे जलवाहिनीच फोडीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर राज्यात मोठा गजहब निर्माण झाला. राजकीय गोटात खळबळ उडाली. जलवाहिनीच्या टोकावर जिथे सिमेंट घातले गेले आहे त्यामूळे पाणी पुढे वाहत नाही. त्यामुळे सिमेंटच्या जागी आपण जलवाहिनी फोडेन असे साळगावकर म्हणाले होते. मात्र आठ दिवस झाले तरी गोवा प्रशासनाने या धमकीची काहीच दखल घेतली नाही. मंत्र्याने जलवाहिनी फोडण्याची धमकी देऊन देखील प्रशासन ढिम्म व मंत्र्याच्या मतदारसंघातील नळ कोरडेच असे वृत्त लोकमतने देताच चक्रे हलली. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सकाळीच मंत्री जयेश साळगावकर यांना फोन केला व तातडीने बैठकीसाठी बोलावले. बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर, आमदार मायकल लोबो व वरिष्ठ अभियंत्यांना बैठकीसाठी बोलविण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली व पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी विविध ठोस अशा  उपाययोजना जाहीर केल्या. मंत्री साळगावकर यांच्या मतदारसंघात रोज पाणी पुरवठा व्हायलाच हवा असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अभियंत्यांना बजावले. तसेच यापुढे पाणी साठविण्यासाठी लोकांना टाक्या दिल्या जातील असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.मंत्री साळगावकर यांनी बैठकीनंतर लोकमतशी बोलताना सरकारच्या नव्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. आता तरी प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Governmentसरकार