शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

एलआयसीच्या जीवन शांती पेन्शन प्लॅनला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 13:20 IST

आयुर्विमा महामंडळाच्या जीवन शांती पेन्शन प्लॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

पणजी : आयुर्विमा महामंडळाच्या जीवन शांती पेन्शन प्लॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १२ सप्टेंबर रोजी हा प्लॅन खुला केल्यानंतर पहिल्याच दिवशी देशभरात १०,०००जणांनी पॉलिसी उतरविल्या आहेत. महामंडळाला यातून ४१ कोटी रुपये मिळाल्याची माहिती एलआयसीच्या गोवा विभागाचे ज्येष्ठ व्यवस्थापक राजेश मिध्दा यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना मिध्दा म्हणाले की, गोव्यातही पहिल्याच दिवशी ४८ जणांनी पॉलिसी उतरविल्या व त्यातून १ कोटी ८४ लाख रुपये या विभागाला मिळाले. आज चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्याने माणसाचे आयुष्यमान सरासरी ७५ ते ८० वर्षांवर पोचले आहे. १९४७ साली सरासरी आयुष्यमान ४९ ते ५० वर्षे एवढेच होते. याआधी २००१ मध्ये जीवन अक्षय योजना आणली होती. नव्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण रक्कम आणि व्याजही गृहीत धरून लाभ दिला जातो. ३१ मार्च २०१९ पर्यंत गोव्यात किमान २०० कोटी रुपयांचा व्यवसाय या नव्या प्लॅनद्वारे करण्याचा करण्याचे उद्दिष्ट आहे.

१९ टक्‍क्‍यांपर्यंत लाभ या पेन्शन योजना योजनेतून मिळू शकतो. बँकाही एवढे व्याज देत नसल्याचे मिध्दा म्हणाले. अलीकडची महागाई वाढली पाहता पेन्शन महागाईच्या तुलनेत तेवढी वाढत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर लोकांना आर्थिक नियोजनाबाबत कसरत करावी लागते. जीवन शांती प्लॅन लोकांसाठी वरदान ठरलेला आहे. पहिल्याच दिवशी एवढा भरभरून प्रतिसाद देऊन लोकांनी एलआयसीवर मोठा विश्वास दाखवला आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत गेल्या आठ दिवसात ५४ पॉलिसीधारक गोव्यात झालेले आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त सर्वजण व्यस्त असल्याने थोडी मंदी होती. परंतु आता पुढील काळात जास्तीत जास्त प्रमाणात गोव्यात लोक आपल्या पॉलिसी उतरवतील, असे ते म्हणाले. गोवा विभागाचे १०८ एलआयसी विकास अधिकारी तसेच एकूण ३ हजार ७१५ कर्मचारी आहेत. नजीकच्या काळात आयुर्विमा महामंडळ आणखीही काही आकर्षक प्लॅन लोकांसाठी घेऊन येणार आहे, असे स्पष्ट करून मिध्दा म्हणाले की, जीवन अक्षय योजना सुरू केली तेव्हा १२ टक्के व्याज आम्ही आश्वासीत केले होते. त्याप्रमाणे आजतागायत आम्ही ते देत आहोत. मात्र बँका त्यावेळी १३ टक्के व्याज देत होते ते आता ५ टक्क्यांवर आलेले आहे. त्यामुळे एलआयसीमध्ये गुंतवणूक ही विश्वासार्ह असल्याची लोकांनाही खात्री पटलेली आहे. एलआयसी सरकारी रोखे किंवा तत्सम खात्रीशीर ठिकाणीच पैशांची गुंतवणूक करीत असते त्यामुळे लोकांचे पैसे सुरक्षित असतात आणि आम्ही परतावाही जास्तीत जास्त प्रमाणात देऊ शकतो, असे म्हणाले.

पत्रकार परिषदेत विभागीय उपसरव्यवस्थापक नकुल बेंद्रे, विपणन व्यवस्थापक अभय कुलकर्णी, निखिल बाम आदी उपस्थित होते. एक ते वीस वर्षांसाठी हा प्लॅन घेतला जाऊ शकतो तात्काळ लाभ किंवा मुदतीने लाभ अशा दोन पर्यायांची ग्राहक निवड करू शकतात. ऑनलाइन पॉलिसी घेतली जाऊ शकते. वैयक्तिक, संयुक्त किंवा दिव्यांगानाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. वयाच्या ३० वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीला ही पॉलिसी घेता येईल. मृत्यू झाल्यास पॉलिसीवर लाभ मिळेल.

टॅग्स :goaगोवा