शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लताजींच्या ध्यासाने माझा आवाज मधुर बनला, अनुराधा पौडवाल यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 22:02 IST

माझा मूळ आवाज हा इतका गोड नव्हता. परंतु बालपणी एकदा लता मंगेशकर यांचे स्टुडिओमध्ये चाललेले रेकॉर्डिंग ऐकले व लतादीदींचा आवाज माझ्या मना काळजावर कोरला गेला.

पणजी: माझा मूळ आवाज हा इतका गोड नव्हता. परंतु बालपणी एकदा लता मंगेशकर यांचे स्टुडिओमध्ये चाललेले रेकॉर्डिंग ऐकले व लतादीदींचा आवाज माझ्या मना काळजावर कोरला गेला. त्या क्षणापासून सतत त्यांच्याच आवाजाचा ध्यास घेतला आणि चमत्कार व्हावा तसा माझा आवाज गोड झाला. हे उद्गार आहेत, विख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे. त्यांच्या गोव्या भेटीदरम्यान कला अकादमीत घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.स्वस्तिक व कला अकादमीतर्फे आयोजित केलेल्या हितगूज कार्यक्रमात प्रा. संगीता अभ्यंकर यांनी पौडवाल यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीत पौडवाल यांनी आपल्या संगीतमय जीवनातील ब-याच गोष्टी उघड केल्या. त्या म्हणाल्या एखाद्या गोष्टीचा जर मनापासून ध्यास घेतला तर ती गोष्ट प्रत्यक्षात उतरते, याचा मला प्रत्यय आला आहे. चौथी इयत्तेत असताना लताजींचा आवाज स्टुडिओत ऐकला आणि त्या आवाजाची कायम मोहिनी माझ्यावर पडली. मलाही तसाच आवाज पाहिजे यासाठी ध्यास धरला होता. त्यातच मी न्युमोनियामुळे ४० दिवसांहून अधिक काळ आजारी पडले होते. त्याकाळात लताजींच्या आवाजातील भगवद्गीता आणि त्यांची गाणी कायम ऐकत राहिले. त्यांचा आवाज ऐकत आजारातून बरीही झाले तेव्हा चमत्कारच व्हावा तसा माझा आवाजही पूर्वीचा राहिला नव्हता. अगधी लतादितींसारखा हुबेहूब नसला तरी खूपच जवळ गेल्याचे जाणवत होते.बहुतेक गुणवान मुली या लग्नापूर्वी गाण्यात खूप नाव कमावतात आणि लग्न झाल्यानंतर गाणे कुठे तरी हरवून जाते. आपले मात्र एकदम उलट झाल्याचे पौडवाल यांनी सांगितले. लग्नापूर्वी केवळ आवड होती म्हणून गुणगुणत होते. कार्यक्रम, रेकॉर्डिंग वगैरे काहीच नव्हते. लग्न होऊन एक मुलगी झाल्यानंतर स्टुडिओत गाणे झाले आणि नंतर पार्श्वगायिकाही झाली, असे त्या म्हणाल्या. गायनाची आवड होतीच. पती अरुण पौडवाल हे संगीत इंडस्ट्रीमध्ये होतेच. परंतु वशिला लावून मला इंडस्ट्रीत नेण्याच्या विरोधात ते होते. माझे सासरे आपल्या ओळखीचा उपयोग करून गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमात माझे गायन होईल, याची व्यवस्था करीत होते. अशाच एका कार्यक्रमात मला मानधन म्हणून ३०० रुपये मिळाले होते. त्या ३०० रुपयांची गोडी इतकी अवीट होती की त्याची सर आताच्या लाखो रुपयांना नाही, असे त्या म्हणाल्या.युवक-युवतींना संदेश देताना त्यांनी यशाचे शिखर हे आपण ठरवायचे असते, असे सांगितले. अमुक एका व्यक्तीने अमुक उंचीपर्यंत मजल मारली म्हणून आपल्यालाही तितकीच मारावी लागेल हा विचार चुकीचा आहे. ती त्यापेक्षा अधिक वरही असू शकते किंवा जरा खालीही असू शकते. हे लक्ष्य आपण स्वत: ठेवावे आणि मुख्य म्हणजे ते समाधान देणारे असावे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Anuradha Paudwalअनुराधा पौडवाल