शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

नेतृत्वहीन कॉंग्रेस आहे, सरकार नव्हे, भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 10:15 PM

गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. 

पणजी - गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काब्राल यांनी कॉंग्रेसचे राज्यपालांना दिलेले निवेदन म्हणजे फसलेला स्टंट असल्याचे सांगितले. सरकार अस्तित्वात नसल्याचा आरोप करणारा कॉंग्रेस नेते आता सरकार नेतृत्वहीन असल्याचे सांगतात. गोव्याचे सरकार नेतृत्वहीन नाही. मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणास्तव विदेशात उपचार घेत असले तरी त्यांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीद्वारे राज्यकारभार सुरू आहे. या उलट कॉंग्रेसची स्थिती झालेली आहे. ते गोव्यात प्रदेशाध्यक्ष ठरवू शकत नाहीत आणि आरोप मात्र सरकारवर करतात असे काब्राल यांनी सांगितले. तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीला घटनात्मक आधार नसल्याचा शांताराम नाईक यांचा दावाही त्यांनी फेटाळला. विधानसभा अधिवेशनाच्या मुद्यावर बोलताना काब्राल म्हणाले की आता अधिवेशन जुनमध्ये घेतले जाईल. त्यापूर्वी अधिवेशनाची गरज नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी ७ दिवसांपूर्वीच आपण बोललो होतो. त्यांची प्रकृती सुधारत आहे. उपचारांना ते दाद देत आहेत. गोव्यात येण्या एवढी त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर ते गोव्यात परततील असेही ते म्हणाले.  माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. खाण बंदीमुळे लोकांचा रोजगार जात आहे. कंपन्याकडून कामगारांना काढणे थांबवावे. आणखी काही काळ धीर धरावा. खाण उद्योग सुरू होण्याच्या बाबतीत खूप आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस