शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

'कदंब'ची उद्यापासून वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी, कोरजाई मार्गावर बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:51 IST

तब्बल सहा महिन्यांच्या कालखंडानंतर शेजारी महाराष्ट्रात कदंबच्या गाड्या जाऊ लागणार

पणजी : कदंब महामंडळ उद्या मंगळवार पासून महाराष्ट्रातील काही निवडक मार्गांवर बससेवा सुरू करत आहे. वेंगुर्ले, मालवण सावंतवाडी आणि कोरजाई या मार्गांवर या बसगाड्या उद्यापासून धावणार आहेत. कदंब महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्रारंभी आम्ही प्रत्येकी दोन-दोन फेऱ्याच सुरू करीत आहोत.

तब्बल सहा महिन्यांच्या कालखंडानंतर शेजारी महाराष्ट्रात कदंबच्या गाड्या जाऊ लागणार आहेत. शेजारी सिंधुदुर्गातील अनेक तरुण गोव्यात नोकरीसाठी येत असतात. १ सप्टेंबरपासून सीमा खुल्या झाल्या तरी त्यांना ये जा करणे अशक्य बनले होते. सार्वजनिक बस वाहतूक आता सुरू होत असल्याने या नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.

घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार वास्को- वेंगुर्ले बस सकाळी ६ वाजता वास्कोहून सुटेल. पणजीहून सकाळी ७.१५ वाजता ही बस वेंगुर्लेकडे निघेल. वेंगुर्ल्याहुन परतीच्या प्रवासासाठी सकाळी १०.०५ मिनिटांनी ही बस सुटेल.

पणजीहून वेंगुर्लेला जाण्यासाठी दुपारी १.०५ वाजता बस सुटेल. हीच बस वेंगुर्ल्याहुन परतीच्या प्रवासासाठी दुपारी ४ वाजता निघेल.

वास्को -वेंगुर्ले- कोरजाई बस सकाळी ७ वाजता वास्कोहून सुटेल. पणजीहून सकाळी ८.१० मिनिटांनी ही बस वेंगुर्लेकडे निघेल. परतीच्या प्रवासासाठी कोरजाईहून सकाळी ११.४५ वाजता ही बस निघेल आणि वेंगुर्लेमार्गे येईल.

मडगाव- मालवण बस सकाळी ७.४५ वाजता मडगावहून सुटेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस दुपारी २.३० वाजता मालवणहून निघेल.

पणजीहून घोडगेवाडी बस सायंकाळी ५.४० वाजता सुटेल. ही बस वस्तीला राहील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता घोडगेवाडीहून पणजीला येण्यासाठी निघेल.

पणजी- पत्रादेवी- सावंतवाडी बस सायंकाळी ५.४५ वाजता आणि सायंकाळी ६.३० वाजता सावंतवाडीला जाण्यासाठी निघतील. या दोन्ही बसेस वस्तीला राहणार असून एक बस दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता तर दुसरी बस सकाळी ७.१५ वाजता पणजीला येण्यासाठी निघेल. 

कारवार, बेळगावलाही बसेसपणजीहून कारवारला जाण्यासाठी सायंकाळी ५.१५ वाजता बस निघेल. ही बस कारवारहून परतीच्या प्रवासासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता निघेल.

घाटे म्हणाले की, गोवा - कारवार मार्गावर सध्या ५ बसेस धावत आहेत तसेच मडगाव- बेळगाव, पणजी- बेळगांव ४ बसगाड्या सुरू झालेल्या आहेत. कालांतराने या फेऱ्या वाढविण्यात येतील.