शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दुस-याकडे न सोपवणं चुकीचं- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 9:36 PM

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला.

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दुस-याकडे न सोपवून पर्रीकरांनी राज्याचं नुकसान केल्याचा आरोप शांताराम नाईक यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा आजार लवकर बरा व्हावा, असे आपल्यासह काँग्रेसलाही वाटते. परंतु त्यांच्या आजारामुळे राज्याचे आरोग्य बिघडू देता कामा नये. फायली अडून असल्यामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. एका माणसाच्या आजारामुळे संपूर्ण राज्याला वेठीस धरले जात आहे हे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले. दुस-या मंत्र्याकडे जबाबदारी देण्याऐवजी मंत्र्यांना ५० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार देणे, ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार तीन मंत्र्यांना देणे हे काय प्रकार चालले आहेत ? याला कोणता संविधानिक आधार आहे ? आणि ५ कोटी रुपये खर्चापेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावाचे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही. खुद्द भाजपमधील मंत्र्यांवर आणि आमदारांवरही विश्वास नाही असाच त्याचा अर्थ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप व घटक पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाचे काय झाले त्याचा कुणी तरी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. माडाला राज्यवृक्षाचा दर्जा देण्याची एक गोष्ट सोडून या कार्यक्रमपत्रिकेवरील कोणतीच गोष्ट करण्यात आलेली नसल्याचे ते म्हणाले. किमान समान कार्यक्रमात दीनदयाळ उपाध्याय गोवा फॉरवर्डला कसे चालतात, असेही त्यांनी विचारले. आरोग्य विमा योजनेला सरकारने दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर