शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

आरजीच्या अटींचा 'फुटबॉल' काँग्रेसने लगेच टोलवला; फातोर्ड्यात इंडिया आघाडीची बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2024 10:25 IST

प्रचाराची रणनीतीही ठरली

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव :इंडिया आघाडीला तीन अटी घालून जागा वाटपासंबंधी चर्चेला तयार असल्याचे पिल्लू आरजीने सोडले खरे. मात्र, त्यानंतर काही तासांतच आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत आरजी हा भाजपाचाच 'ट्रॅप' असल्याचा आरोप करत तिन्ही अटी फेटाळण्यात आल्या. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास राहिले असतानाच आरजीने जागा वाटपाबाबत दिलेल्या प्रस्तावाने काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष चक्रावले.

म्हादई नदीवरील कर्नाटकचा कळसा-भंडुरा प्रकल्प मोडीत काढणार असल्याचे काँग्रेसने राष्ट्रीय जाहीरनाम्यात घोषित करावे, गोव्यात सरकारी व कोमुनिदाद जमिनींमधील परप्रांतीयांच्या झोपड्या पाडणार व त्यांची मतदार ओळखपत्रे रद्द करणार, असे काँग्रेसने राज्य जाहीरनाम्यात घोषित करावे आणि भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी 'पोगो' विधेयकाला पाठिंबा द्यावा, अशा तीन अटी आरजीने घातल्या होत्या व काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती.

काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक काल सायंकाळी फातोर्डा येथे झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लस फेरेरा, आमदार एल्टन डिकोस्ता, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, उद्धवसेनेचे गोवा प्रमुख जितेश कामत आदी उपस्थित होते.

या बैठकीत पुढील रणनीतीबरोबरच आरजीच्या प्रस्तावावर चर्चा झाली. सर्वांनी या अटी अमान्य केल्या. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, आरजी पक्षाने इंडिया आघाडीला अशा प्रकारच्या अटी घालणे हा त्यांच्या राजकीय स्टंट आहे. 

इंडिया आघाडीच्या वतीने श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर, उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप हे दुपारी १२:३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असे सांगण्यात आले. अर्ज दाखल करताना काँग्रेस, आपचे आमदार व इंडिया आघाडीतील सर्व नेते उपस्थित रहाणार आहेत असे सांगण्यात आले.

संयुक्त बैठकीत प्रचाराची पुढील दिशा ठरविण्यात आली. यात घरोघरी प्रचार, कोपरा बैठका घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.

काय म्हणाले होते मनोज परब?

सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी तीन अटी ठेवताना काँग्रेस व इंडिया आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांनी मान्य केल्या तरच आम्ही जागा वाटपाबाबत वाटाघाटीसाठी चर्चेला येऊ, असे सांगितले. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. पैकी एक जागा आरजीला द्यावी किंवा दोन्ही जागा आरजीने लढवाव्यात किंवा दोन्ही जागा इंडिया आघाडीने लढवाव्यात, याबाबत अटी मान्य केल्यानंतरच चर्चेला सुरुवात होईल,' असे म्हटले होते. इंडिया आघाडीतील घटक हे गोवा आणि गोमंतकीयांचे अस्तित्व राखण्यासाठी एकत्र आले असल्याचे सतत सांगत असतात. आरजीवर भाजपाची 'बी' टीम असल्याचा आरोप केला जातो. जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे परब यांनी म्हटले होते. आमचे दोन्ही लोकसभा उमेदवार निवडून आल्यास आम्ही इंडिया आघाडीलाच पाठिंबा देणार आहोत, हे आम्ही आधीच जाहीर केलेले आहे, असेही परब यांनी म्हटले होते.

आरजी हा भाजपाचाच 'ट्रॅप'

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'आरजी हा भाजपानेच लावलेला ट्रॅप आहे. यात आम्ही अडकणार नाही. म्हादई तंटा लवाद काँग्रेस सत्तेवर असतानाच स्थापन झाला. 'पोगो' विधेयक विधानसभेत नामंजूर झालेले आहे. आरजीच्या कोणत्याही अटी मान्य करण्यासारख्या नाहीत. - माणिकराव ठाकरे, गोवा प्रभारी, काँग्रेस.

६ महिन्यांपूर्वी काँग्रेसला सांगितले

दक्षिण गोव्यात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना तिकीट द्या, असे सहा महिन्यांपूर्वी मी काँग्रेस श्रेष्ठींना सांगितले होते, बाणावली येथे जाहीर सभेत ते म्हणाले की, जात, धर्म विसरुन सर्वांनी विरियातो यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातही गोवा फॉरवर्ड रमाकांत खलप यांच्या मागे ठामपणे राहणार आहेत. - आमदार विजय सरदेसाई 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसAAPआपNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना