शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

गोव्यात अट्टल गुन्हेगार कैदी पळतात कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 4:48 PM

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पळण्याच्या घटना अजूनही घडत आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे अत्यंत धोकादायक व ‘मोस्ट वॉन्टेड’ कैदीही पळून जात आहेत ही गंभीर बाब आहे. 

पणजी - पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पळण्याच्या घटना अजूनही घडत आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे अत्यंत धोकादायक व ‘मोस्ट वॉन्टेड’ कैदीही पळून जात आहेत ही गंभीर बाब आहे. मध्य प्रदेशमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला आणि गोव्यात युवतीवर गँगरेप केल्यामुळे पकडलेला क्रूरकर्मा ईश्वर मख्वाना हा पोलिसांच्या हातून निसटल्यामुळे धोकादायक गुन्हेगारांच्या बाबतीत पोलीस किती गंभीर आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

कैदी हे पळून जाण्याची संधीची वाट पाहत असतात आणि त्यातही उपचारासाठी घेऊन जाताना किंवा इस्पितळातून येताना ही संधी ते साधण्याची शक्यता ठाऊक असतानाही एस्कॉर्ट पोलिसांकडून खबरदारी का घेतली जात नाही.  त्यात ईश्वर मख्वानासारख्या अत्यंत जहाल गुन्हेगाराला घेऊन जातानाही काहीच खबरदारी कशी घेतली जात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. ज्या माणसाने अनेक युवक युवतींना दरीत ढकलून दिले आहे आणि ब्लेड वापरून हल्ला करण्यास जो पटाईत आहे आणि भोपाळ पोलिसांना जो मोस्ट वॉन्टेड आहे त्या गुन्हेगाराला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून त्याला उपचारानंतर पुन्हा जेलमध्ये पोहोचवण्यापर्यंत कडक सतर्कता व खबरदारी घेणे आवश्यक होते त्याच्या बाबतीतही पोलिसांनी नेहमीच्या आरोपीसारखीच भूमिका ठेवली.  वास्तविक त्याला नेण्यासाठी किमान ५ तरी कॉन्स्टेबल बरोबर हवे होते. 

अट्टल गुन्हेगार पळून जाण्याचा हा पहिला प्रकार नाही. अनेक घरफोड्या व दरोडे टाकणारा मायकल फर्नांडीसही अनेकवेळा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. तसेच तो तुरुंगातूनही पळाला होता. आता आग्वाद व सडा तुरुंगातील कैदी प्रशस्त व सुरक्षित अशा कोलवाळ तुरुंगात नेले असल्यामुळे तुरूंगातून पळून जाण्याचे प्रकार घडत नाहीत. त्यामुळे तुरुंगाबाहेर पडल्यावर पळण्याची एकही संधी ते सोडणारे नसतात. 

याविषयी माजी तुरुंग महासंचालक एल्वीस गोम्स यांच्याशी संवाद साधला असता गुन्हेगारांना तुरुंगाच्या बाहेर पाठविण्याच्या बाबतीत तुरुंग प्रशासनाचा आणि त्यांची ने आण करण्याच्या बाबतीत  एस्कॉर्ट विभागाची बेपर्वाई ही काही नवी नाही. गुन्हेगार व आरोपी कसलीही निमित्ते करून तुरुंगाबाहेर जाण्याच्या संधीत असतात आणि फारशी चौकशी न करताच त्यांना पाठविलेही जाते. निदान त्यांची ने आण करण्याची जबाबदारी घेणा-यांनी तरी जबाबदार रहायला हवे होते, परंतु तेही गंभीर नसतात असे त्यांनी सांगितले.

तुरुंग प्रशासन शिकवा

तुरुंग प्रशासन म्हणजे काय आहे हे गोव्यात कुणाला ठाऊकच नाही. त्यामुळे इतर राज्यातून कुणी तरी प्रशिक्षित असा माणूस प्रशासक म्हणून काही काळासाठी गोव्यात नेमावा आणि गोव्यातील तुरुंगाची घडी व्यवस्थीत बसवून नंतर त्याला जावू द्यावे असा एक प्रस्ताव मी तुरुंग महानिरीक्षक असताना सरकारला पाठविला होता. परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही असे एल्वीस गोम्स यांनी सांगितले.  

त्यांचे मानवाधिकार 

पूर्वीसारखे कैद्यांना बेड्या ठोकून नेण्याची परवानगी आज नाही. मानवाधिकार आयोगाने तसे करण्यास सक्त मनाई केली आहे, परंतु या आयोगाच्या आदेशालाही अपवाद ठेवणे गरजेचे बनले आहे. दुस-यांचे जगण्याचे मानवधिकार हिसकावून घेणाºयांना तरी बेड्या ठोकण्याची परवानगी मिळावी असे एसकॉर्ट विभागाच्याच एका अधिका-याने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :goaगोवाPrisonतुरुंग