शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गोव्यात १२ फुटीर आमदारांना दिलासा! हायकोर्टाने अपात्रता याचिका फेटाळल्या, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:50 IST

12 Goa MLAs : काँग्रेसचे १० तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ आमदार आमदारकीचा राजीनामा न देताच भाजपमध्ये गेले होते.

पणजी - आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये विधिमंडळ गट विलीन करुन पक्षांतर केलेल्या काँग्रेसच्या १० आणि मगोपच्या २ मिळून 'त्या' १२ फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. मावळत्या विधानसभेत गोव्यातील १२ आमदारांना हा निवाडा दिलासादायक ठरला आहे त्याचबरोबर अन्य राज्यांमध्येही राजकारण्यांना तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या व्दिसदस्यीय खंडपीठाने अपात्रता याचिका फेटाळून लावताना सभापतींचा निवाडा उचलून धरला आहे.

काँग्रेस व मगोपने सभापती राजेश पाटणेकर यांनी एप्रिल २0२१ मध्ये फेटाळल्या होत्या. त्यास दोन्ही पक्षांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. फुटीर आमदारांबरोबरच सभापतींनाही  प्रतिवादी केले होते. काँग्रेसचे १० तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ आमदार आमदारकीचा राजीनामा न देताच भाजपमध्ये गेले होते. दोन्हीकडच्या आमदारांनी आपापला विधिमंडळ गट दोन तृतियांश बहुमताने भाजपमध्ये विलीन केल्याचे जाहीर केले होते.

सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळल्यावर प्रकरण हायकोर्टात गेले होते. पक्षांतरबंदी कायदा तसेच घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा भंग केल्या प्रकरणी या फुटीर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. दहाव्या परिशिष्टात कोणत्याही राजकीय पक्षाचा विधिमंडळ गट दोन तृतियांश बहुमताने दुसºया पक्षात विलीन करण्याची तरतूद नाही, असा याचिकादारांचा दावा होता तर दहाव्या परिशिष्टाचा योग्य अर्थ लावून सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळल्याचे हायकोर्टाने निवाड्यात नमूद केले आहे.

अशी आहे पार्श्वभूमी

जुलै २०१९ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दहा आमदार फुटून भाजपमध्ये गेले होते. काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन केल्याचा त्यांचा दावा होता‌. या आमदारांमध्ये फिलीप नेरी रॉड्रिक्स, बाबूश मोन्सेरात, टोनी फर्नांडिस, इजिदोर फर्नांडिस, जेनिफर मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा, क्लाफासियो डायस, नीळकंठ हळर्णकर व फ्रान्सिस सिल्वेरा यांचा समावेश होता. त्याआधी मगोपमधून रातोरात बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर हे फुटून भाजपमध्ये गेले होते. त्यानीही मगोप विधिमंडळ पक्ष भाजपात विलीन केल्याचे जाहीर केले होते. बाबू आजगांवकर आणि बाबू कवळेकर यांना सावंत सरकारने उपमुख्यमंत्रीपद दिले होते. तसेच अन्य काही फुटीरांना मंत्रिपदे दिली होती.

जनतेच्या दरबारातही न्याय मिळेल - कवळेकर

काँग्रेसी आमदार ज्यांच्या नेतृत्त्वाखाली फुटले ते बाबू कवळेकर यांनी प्रतिक्रिया देताना न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. आता जनतेच्या दरबारातही न्याय मिळेल, असे म्हटले आहे. असत्य जास्त काळ टिकत नाही. आम्ही नेहमी सत्याच्याच मार्गाने गेलो. हा सत्याचा विजय आहे.

सुप्रीम कोर्टात आव्हान देणार - चोडणकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या निवाड्याने गोव्यातच नव्हे तर देशभरात चुकीचा पायंडा घातला. जनतेने दिलेला कौल झुगारुन पैसे घेऊन फुटण्यास लोकप्रतिनिधींना अशाने प्रोत्साहनच मिळेल. चोडणकर म्हणाले की, घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा हेतू घोडाबाजार रोखणे हाच आहे. आम्ही या निवाड्याला आव्हान देताना सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करीत आहोत.’

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय