शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सात वर्षांत सरकारकडून एकही पैसा घेतला नाही: मंत्री विश्वजित राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2024 12:23 IST

सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: व्हीआयपी कल्चर सोडणे ही एकप्रकारची समाजसेवा आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी देशभरात व्हावी, असे मत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.

सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. आपण मागील सात वर्षात सरकारकडून विमान तिकीट, वीजबिले, मोबाइल बिलासह अन्य कुठल्याही सुविधेसाठी पैसे घेतलेले नाहीत. आपण सर्व खर्च स्वतःच करतो. वाहनदेखील आपलेय वापरतो. सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, व्हीआयपी कल्चर सोडण्याचा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी घेतलेल्या निर्णयाचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर व नावेलीचे आमदार तथा कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी स्वागत केले आहे. आमदार व मंत्री है समाजाचे सेवक आहेत. त्यांनी समाजाप्रती योगदान देणे गरजे आहे. मंत्री व आमदारांना सरकार पगार देते. त्यामुळे त्यातून ते आपला खर्च करू शकतात, असे आमदार आरोलकर यांनी सांगितले.

आमदारांनी खर्च पगारातूनच करावा : तुयेकर

आमदार उल्हास नाईक तुवेकर म्हणाले, की मंत्री व आमदार हेसुध्दा सर्वसामान्य लोक आहेत. त्यामुळे आपला खर्च त्यांनी आपल्या पगारातून करावा, मी कदंब महामंडळाचा अध्यक्ष असलो तरी विमान तिकिटाचा खर्च महामंडळाकडून न घेता स्वतःच करतो. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांचा व्हीआयपी कल्चर सोडण्याचा निर्णय हा स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा