शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांत सरकारकडून एकही पैसा घेतला नाही: मंत्री विश्वजित राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2024 12:23 IST

सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: व्हीआयपी कल्चर सोडणे ही एकप्रकारची समाजसेवा आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी देशभरात व्हावी, असे मत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.

सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. आपण मागील सात वर्षात सरकारकडून विमान तिकीट, वीजबिले, मोबाइल बिलासह अन्य कुठल्याही सुविधेसाठी पैसे घेतलेले नाहीत. आपण सर्व खर्च स्वतःच करतो. वाहनदेखील आपलेय वापरतो. सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, व्हीआयपी कल्चर सोडण्याचा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी घेतलेल्या निर्णयाचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर व नावेलीचे आमदार तथा कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी स्वागत केले आहे. आमदार व मंत्री है समाजाचे सेवक आहेत. त्यांनी समाजाप्रती योगदान देणे गरजे आहे. मंत्री व आमदारांना सरकार पगार देते. त्यामुळे त्यातून ते आपला खर्च करू शकतात, असे आमदार आरोलकर यांनी सांगितले.

आमदारांनी खर्च पगारातूनच करावा : तुयेकर

आमदार उल्हास नाईक तुवेकर म्हणाले, की मंत्री व आमदार हेसुध्दा सर्वसामान्य लोक आहेत. त्यामुळे आपला खर्च त्यांनी आपल्या पगारातून करावा, मी कदंब महामंडळाचा अध्यक्ष असलो तरी विमान तिकिटाचा खर्च महामंडळाकडून न घेता स्वतःच करतो. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांचा व्हीआयपी कल्चर सोडण्याचा निर्णय हा स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा