शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

सात वर्षांत सरकारकडून एकही पैसा घेतला नाही: मंत्री विश्वजित राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2024 12:23 IST

सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: व्हीआयपी कल्चर सोडणे ही एकप्रकारची समाजसेवा आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी देशभरात व्हावी, असे मत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.

सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. आपण मागील सात वर्षात सरकारकडून विमान तिकीट, वीजबिले, मोबाइल बिलासह अन्य कुठल्याही सुविधेसाठी पैसे घेतलेले नाहीत. आपण सर्व खर्च स्वतःच करतो. वाहनदेखील आपलेय वापरतो. सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, व्हीआयपी कल्चर सोडण्याचा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी घेतलेल्या निर्णयाचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर व नावेलीचे आमदार तथा कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी स्वागत केले आहे. आमदार व मंत्री है समाजाचे सेवक आहेत. त्यांनी समाजाप्रती योगदान देणे गरजे आहे. मंत्री व आमदारांना सरकार पगार देते. त्यामुळे त्यातून ते आपला खर्च करू शकतात, असे आमदार आरोलकर यांनी सांगितले.

आमदारांनी खर्च पगारातूनच करावा : तुयेकर

आमदार उल्हास नाईक तुवेकर म्हणाले, की मंत्री व आमदार हेसुध्दा सर्वसामान्य लोक आहेत. त्यामुळे आपला खर्च त्यांनी आपल्या पगारातून करावा, मी कदंब महामंडळाचा अध्यक्ष असलो तरी विमान तिकिटाचा खर्च महामंडळाकडून न घेता स्वतःच करतो. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांचा व्हीआयपी कल्चर सोडण्याचा निर्णय हा स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा