शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

जॉर्ज फर्नाडिस यांच्या ‘त्या’ गाजलेल्या सभेची अजूनही गोवेकरांना आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:54 IST

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस म्हणजे मुलूख मैदानी तोफच. ते बोलू लागल्यावर ऐकणारा जनसमुदायाच्या अंगावर अक्षरश: काटा उभा रहायचा.

- सुशांत कुंकळयेकर 

मडगाव -  माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस म्हणजे मुलूख मैदानी तोफच. ते बोलू लागल्यावर ऐकणारा जनसमुदायाच्या अंगावर अक्षरश: काटा उभा रहायचा. 1987 साली गोवेकरांनीही हा अनुभव घेतला. मडगावात अगदी भर दुपारी उन्हाचा तडाखा असतानाही त्यांच्या या सभेला लोकांनी एवढी गर्दी केली होती की, मडगावचे लोहिया मैदान जनसमुदायाने भरुन ओसंडत होते. आजही मडगावकर त्या गाजलेल्या सभेची आठवण काढतात.  मडगावकरांना खूष करण्यासाठी त्यावेळी जॉर्ज फर्नाडिस  यांनी तब्बल दहा मिनिटे अस्सल मंगळुरी कोंकणी शैलीतून संवाद साधला होता.या बैठकीच्या आयोजकांपैकी एक असलेले अॅड. जगदीश प्रभूदेसाई हे आजही तेव्हाची ती घटना अगदी काल झाल्यासारखी स्पष्टपणो सांगतात. या सभेची पाश्र्र्वभूमी अशी की, राजीव गांधी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन व्ही. पी. सिंग त्यावेळी नुकतेच बाहेर पडले होते. त्यांनी त्यावेळी ‘जनमोर्चा’ नावाची राजकीय आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला जॉर्ज फर्नाडिस यांचाही खंदा पाठिंबा होता. याच दरम्यान, त्यांनी गोव्याचा दौरा आखला होता. मडगावात त्यांनी सभा घ्यावी यासाठी अॅड. प्रभूदेसाई, माजी आमदार कृष्णनाथ बाबुराव नाईक, त्यावेळी राजकीय चळवळीत सक्रीय असलेले तुळशीदास मळकण्रेकर हे सिंग यांच्याकडे गेले होते. मडगावात अगदी भर दुपारी त्यांची सभा ठेवली होती. वेळ दुपारची असूनही लोहिया मैदान तुडूंब भरले होते. या भरलेल्या मैदानावर लोकांशी संवाद साधताना, जॉर्ज यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करताना, आणिबाणीच्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या 80 वर्षाच्या आईवरही दबाव आणण्यास मागेपुढे पाहिले नाही असे वक्तव्य केले. प्रभुदेसाई म्हणतात, दुस:या दिवशी फर्नाडिस यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय वृत्तपत्रंवर हेडलाईन झाले होते.फर्नांडिस यांच्या साधेपणाबद्दल बोलताना प्रभुदेसाई म्हणाले, त्या सभेला सिंग व फर्नाडिस यांच्याबरोबर दत्ता सामंतही आले होते. या तिघांचीही रहाण्याची सोय मडगावच्या गोल्ड स्टार या हॉटेलात केली होती. ज्या दिवशी ही सभा होती नेमक्या त्याचवेळी हॉटेलची लिफ्ट बंद पडली. हे कळल्यावर पांढरा लेंगा आणि साधासा कुर्ता घालून सभेसाठी तयार झालेले फर्नाडिस हे जीन्यानेच फटाफट खाली उतरले आणि कुठलाही बडेजाव न दाखविता त्यांनी लोहिया मैदानची वाटही पकडली. कित्येक जणांच्या स्मरणातून आजही ही गाजलेली सभा गेलेली नाही.मूळ कोंकणी माणूस असल्याने गोव्याबद्दल काहीसे ममत्व असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांच्यामुळे गोवेकरांना कोंकण रेल्वेचाच फायदा झाला असे नव्हे तर फर्नाडिस यांच्यामुळेच दाबोळीच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला.माजी मुख्यमंत्री लुईङिान फालेरो हे अजुनही या घटनेची आठवण काढतात. ‘लोकमत’शी बोलताना फालेरो म्हणाले, 1997 साली मी गोव्याचा मुख्यमंत्री असताना फर्नाडिस केंद्रात संरक्षण मंत्री होते. दाबोळी विमानतळ हा लष्करी विमानतळ असल्याने त्यावर नागरी विमान वाहतुकीला कमी वेळ मिळायचा. यामुळे गोव्यातील पर्यटनावर विपरित परिणाम होईल हे मी फर्नाडिस यांना पटवून देवू शकलो. त्यांनी माझी मागणी मान्य करताना दाबोळी विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता देण्याबरोबरच नागरी उड्डाणासाठी या विमानतळावर वेळही वाढवून दिला.फर्नाडिस हे मूळचे कामगार नेते असल्याने आणि मीही कामगार चळवळीतून पुढे आल्यामुळे या एका धाग्याने आम्हाला दोघांनाही बरेच जवळ आणले होते असे फालेरो म्हणाले. विमानतळा संदर्भात ज्यावेळी मी फर्नाडिस यांच्याशी बोलणी करण्यासाठी दिल्लीला जात होतो त्यावेळी माङो विमान दोन तास उशिरा धावत होते. याची कल्पना देण्यासाठी मी फर्नाडिस यांच्या कार्यालयात फोन केला त्यावेळी फर्नाडिस यांनी मला सांगितले की, तुमचे विमान उशिरा येणार याची मला माहिती आहे. तुम्ही काही काळजी करु नका. दिल्लीला पोहोचल्यावर थेट माङया कार्यालयात या. मी तुमची वाट पहातो, फालेरो यांनी सांगितले. एवढा साधा राजकारणी मी कधी पाहिला नाही असे ते म्हणाले.माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही फर्नाडिस यांच्या साधेपणाबद्दल बोलताना सांगितले, ते दिल्लीत संरक्षण मंत्री असताना मी गोव्यात शिष्टाचार मंत्री होतो. शिष्टाचार खात्याचा मंत्री या नात्याने ज्यावेळी फर्नाडिस गोव्यात यायचे त्यावेळी मी त्यांचे स्वागत करण्यासाठी जायचो. मात्र त्यांनी कधी संरक्षण मंत्र्याचा आब दाखविला नाही. विमानातून उतरताना ते  आपली बॅग स्वत: हातात घेऊन खाली उतरायचे.माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी फर्नाडिस यांच्या आठवणी जाग्या करताना, जॉर्जमुळेच गोवेकरांना कोंकण रेल्वे मिळाली. या रेल्वेचा गोव्यातील मार्ग निश्र्चित करताना मी संसदेत त्यांच्याकडे कित्येकदा भांडलोही. मात्र या भांडणाचा आमच्या वैयक्तिक संबंधावर कधी परिणाम झाला नाही असे ते म्हणाले. चर्चिल आलेमाव यांनीही फर्नाडिस यांच्या आठवणी जाग्या करताना, आपले त्यांच्याशी अगदी कौटुंबिक संबंध होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर केंद्रात त्यांना भेटायला गेलो त्यावेळी किमान एक वर्ष तरी मीच मुख्यमंत्रीपदी रहावे असा त्यांचा आग्रह होता. पण दिलेल्या शब्दाप्रमाणो मी 18 दिवसात मुख्यमंत्री पद सोडले. असे जरी असले तरी पुढच्या राजकीय कारकिर्दीत फर्नाडिस यांनी मला सतत मार्गदर्शन केले. शेवटर्पयत त्यांनी हे नाते सांभाळून ठेवले होते असे ते म्हणाले. चर्चिल आलेमाव हे मुख्यमंत्री असतानाच रेल्वे मंत्रीपद सांभाळणा:या जॉर्ज फर्नाडिस यांनी मडगावच्या रेल्वे उड्डाण पुलाची पायाभरणी केली होती.

 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसgoaगोवाPoliticsराजकारण