शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जनगणना करण्यास सरकार अनुकूल: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:39 IST

राज्यातील भंडारी समाजाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. राज्य सरकार या मागणीचा गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना करण्यासाठी सरकार मागे राहणार नाही, असे केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाईक म्हणाले की, सरकार आपल्या परीने समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत असते. भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. आम्ही सत्ताधारी त्यामुळे प्रत्येक गोष्ट ताळमेळ घालूनच करावी लागते. ओबीसी जनगणना लवकर व्हायला हवी, असे मलाही वाटते. सरकारला सांगून ती लवकर करुन घेऊ.

भाजपचे काही माजी मंत्री, आमदार या प्रश्नावर गोवा फॉरवर्ड तसेच कांग्रेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले त्याबद्दल विचारले असता नाईक म्हणाले की लोकशाहीत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मागील गोष्टी आता उकरुन काढण्यात अर्थ नाही. समाजाला न्याय देण्यासाठी विलंब लावून चालणार नाही. दरम्यान, समाजाचा कोणीही नेता अजून तरी या विषयावर आपल्याला भेटलेला नाही, असे नाईक यांनी शेवटी सांगितले.

समाजाच्या मागणीचा विचार करू : दामू

२०११ साली आमदार असताना मीच ओबीसींना २७ टक्के आरक्षणाचा ठराव विधानसभेत आणला होता व तो एकमताने संमत करण्यात आला होता. आताही भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीचाही विचार केला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

भंडारींच्या मागणीस मगोचा पाठिंबा

भंडारी समाजातील काही नेते अलीकडे सातत्याने नव्याने जगणना करण्याची मागणी करत आहेत. या मागणीला मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पाठिंबा दिला आहे. 'लोकमत'शी बोलताना ढवळीकर म्हणाले की ओबीसींना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावर हक्क मिळायला हवेत. नव्याने ओबीसींची जनगणना करण्याची मागणी योग्य आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण