शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

ओबीसी जनगणना करण्यास सरकार अनुकूल: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:39 IST

राज्यातील भंडारी समाजाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. राज्य सरकार या मागणीचा गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना करण्यासाठी सरकार मागे राहणार नाही, असे केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाईक म्हणाले की, सरकार आपल्या परीने समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत असते. भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. आम्ही सत्ताधारी त्यामुळे प्रत्येक गोष्ट ताळमेळ घालूनच करावी लागते. ओबीसी जनगणना लवकर व्हायला हवी, असे मलाही वाटते. सरकारला सांगून ती लवकर करुन घेऊ.

भाजपचे काही माजी मंत्री, आमदार या प्रश्नावर गोवा फॉरवर्ड तसेच कांग्रेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले त्याबद्दल विचारले असता नाईक म्हणाले की लोकशाहीत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मागील गोष्टी आता उकरुन काढण्यात अर्थ नाही. समाजाला न्याय देण्यासाठी विलंब लावून चालणार नाही. दरम्यान, समाजाचा कोणीही नेता अजून तरी या विषयावर आपल्याला भेटलेला नाही, असे नाईक यांनी शेवटी सांगितले.

समाजाच्या मागणीचा विचार करू : दामू

२०११ साली आमदार असताना मीच ओबीसींना २७ टक्के आरक्षणाचा ठराव विधानसभेत आणला होता व तो एकमताने संमत करण्यात आला होता. आताही भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीचाही विचार केला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

भंडारींच्या मागणीस मगोचा पाठिंबा

भंडारी समाजातील काही नेते अलीकडे सातत्याने नव्याने जगणना करण्याची मागणी करत आहेत. या मागणीला मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पाठिंबा दिला आहे. 'लोकमत'शी बोलताना ढवळीकर म्हणाले की ओबीसींना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावर हक्क मिळायला हवेत. नव्याने ओबीसींची जनगणना करण्याची मागणी योग्य आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण