शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ओबीसी जनगणना करण्यास सरकार अनुकूल: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:39 IST

राज्यातील भंडारी समाजाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. राज्य सरकार या मागणीचा गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना करण्यासाठी सरकार मागे राहणार नाही, असे केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाईक म्हणाले की, सरकार आपल्या परीने समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत असते. भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. आम्ही सत्ताधारी त्यामुळे प्रत्येक गोष्ट ताळमेळ घालूनच करावी लागते. ओबीसी जनगणना लवकर व्हायला हवी, असे मलाही वाटते. सरकारला सांगून ती लवकर करुन घेऊ.

भाजपचे काही माजी मंत्री, आमदार या प्रश्नावर गोवा फॉरवर्ड तसेच कांग्रेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले त्याबद्दल विचारले असता नाईक म्हणाले की लोकशाहीत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मागील गोष्टी आता उकरुन काढण्यात अर्थ नाही. समाजाला न्याय देण्यासाठी विलंब लावून चालणार नाही. दरम्यान, समाजाचा कोणीही नेता अजून तरी या विषयावर आपल्याला भेटलेला नाही, असे नाईक यांनी शेवटी सांगितले.

समाजाच्या मागणीचा विचार करू : दामू

२०११ साली आमदार असताना मीच ओबीसींना २७ टक्के आरक्षणाचा ठराव विधानसभेत आणला होता व तो एकमताने संमत करण्यात आला होता. आताही भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीचाही विचार केला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

भंडारींच्या मागणीस मगोचा पाठिंबा

भंडारी समाजातील काही नेते अलीकडे सातत्याने नव्याने जगणना करण्याची मागणी करत आहेत. या मागणीला मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पाठिंबा दिला आहे. 'लोकमत'शी बोलताना ढवळीकर म्हणाले की ओबीसींना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावर हक्क मिळायला हवेत. नव्याने ओबीसींची जनगणना करण्याची मागणी योग्य आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण