शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ओबीसी जनगणना करण्यास सरकार अनुकूल: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:39 IST

राज्यातील भंडारी समाजाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. राज्य सरकार या मागणीचा गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना करण्यासाठी सरकार मागे राहणार नाही, असे केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाईक म्हणाले की, सरकार आपल्या परीने समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत असते. भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीला सरकारचा विरोध नाही. आम्ही सत्ताधारी त्यामुळे प्रत्येक गोष्ट ताळमेळ घालूनच करावी लागते. ओबीसी जनगणना लवकर व्हायला हवी, असे मलाही वाटते. सरकारला सांगून ती लवकर करुन घेऊ.

भाजपचे काही माजी मंत्री, आमदार या प्रश्नावर गोवा फॉरवर्ड तसेच कांग्रेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले त्याबद्दल विचारले असता नाईक म्हणाले की लोकशाहीत आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मागील गोष्टी आता उकरुन काढण्यात अर्थ नाही. समाजाला न्याय देण्यासाठी विलंब लावून चालणार नाही. दरम्यान, समाजाचा कोणीही नेता अजून तरी या विषयावर आपल्याला भेटलेला नाही, असे नाईक यांनी शेवटी सांगितले.

समाजाच्या मागणीचा विचार करू : दामू

२०११ साली आमदार असताना मीच ओबीसींना २७ टक्के आरक्षणाचा ठराव विधानसभेत आणला होता व तो एकमताने संमत करण्यात आला होता. आताही भंडारी समाजाकडून होत असलेल्या मागणीचाही विचार केला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

भंडारींच्या मागणीस मगोचा पाठिंबा

भंडारी समाजातील काही नेते अलीकडे सातत्याने नव्याने जगणना करण्याची मागणी करत आहेत. या मागणीला मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पाठिंबा दिला आहे. 'लोकमत'शी बोलताना ढवळीकर म्हणाले की ओबीसींना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावर हक्क मिळायला हवेत. नव्याने ओबीसींची जनगणना करण्याची मागणी योग्य आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण