शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

गोव्याच्या खाण भागात उद्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 14:22 IST

राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे.

ठळक मुद्देराज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे. खाणबंदीमुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवले असून खाणपट्ट्यातील छोटे हॉटेलवाले तसेच अन्य दुकानदारही संकटात आहेत. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाण पट्ट्यात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.

पणजी : राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (26 फेब्रुवारी) रोजी थिवीपासून सांगेपर्यंत संपूर्ण खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे.

मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी या बंदची सर्व तयारी झाली असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की वरील खाणपट्ट्यात सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात याव्यात असे आमचे आवाहन आहे. सार्वजनिक वाहतूक, शाळा, महाविद्यालये मात्र नेहमीप्रमाणे चालू असतील. उद्याचा बंद बाजारपेठा बंद ठेवून कडकडीत पाळला जावा यासाठी धारबांदोडा,सांगे, डिचोली, साखळी, पाळी, होंडा आदी भागात बैठका घेतलेल्या आहेत. खाणबंदीमुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवले असून खाणपट्ट्यातील छोटे हॉटेलवाले तसेच अन्य दुकानदारही संकटात आहेत. या सर्वांनी बंदसाठी एकी दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे. गावकर म्हणाले की आम्ही बंदसाठी कुणावरही सक्ती करणार नाही. सध्या परीक्षांचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेतलेली आहे. बंदचा उपद्रव सर्वसामान्य जनतेला होऊ नये हीच आमची इच्छा आहे परंतु त्याचबरोबर खाणबंदीमुळे जी संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे तो प्रकारही तेवढाच गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्या निदर्शनास त्या परिणामांची तीव्रता आणून देण्यासाठी  बाजारपेठा तरी बंद ठेवाव्यात.

दरम्यान, बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाण पट्ट्यात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली असून सांगेपर्यंत तसेच डिचोली सत्तरी भागातही पोलीस रात्रीपासूनच तैनात करण्यात येणार आहे. खाणी सुरू करण्यासाठी संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करावी किंवा वटहुकूम काढला जावा अशी अवलंबितांच्या मागणी होती परंतु या दोन्ही गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत. तसेच तिसरा मार्गही सरकारने काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी अवलंबितांचे शिष्टमंडळ गेले असता केवळ मै देखता हू एवढेच म्हणाले यामुळे केंद्र सरकारचे काहीच केले नाही तसेच खासदार केंद्राकडे हा विषय सोडविण्यात अपयशी ठरले आहेत अशी अवलंबितांची भावना बनली आहे. खाणबंदीनंतर गोव्यात अनेक कंपन्यांनी कामगारांना सेवेतून काढून टाकले आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे  तसेच खनिजवाहू ट्रक, बार्जेस  यांना कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळे या व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस