शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल नेहरूंमुळे गोवामुक्तीस विलंब: शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 19:28 IST

गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही.

पणजी : गोवा मुक्तीसाठी विलंब होण्याचे कारण हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असल्याचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.  

चौहान म्हणाले, ‘भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यांतच राहिला. गोमंतकीय स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी होती. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही’.  जी नीती गोव्याच्या बाबतीत वापरली तीच नीती नेहरूंनी काश्मीरच्या बाबतीत वापरली असे चौहान यांनी सांगितले. राजा हरिसंग यांनी काश्मीर भारतात सामाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही ३७० कलमांतर्गत विशेष दर्जा देऊन काश्मीर कायमचे लटकत ठेवण्यात आले. तसेच पाकिस्तानी काश्मीरवर हल्ला केल्यानंतर आपल्या सैनिकांनी त्यांना जबरजस्त उत्तर दिल्यामुळे त्यांना पिछेहाट करावी लागली. पाकीस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग आपले लष्कर पुन्हा मिळविण्याच्या मार्गावर असताना संयुक्त राष्ट्र संघात जाऊन युद्धबंदी करण्याची घाई नेहरूंनी केली. ही नीती देश विघटीत करण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. 

जे कॉंग्रेसला ७० वर्षांत जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ४८ तासात करून दाखविले आणि काश्मीरला लागू करण्यात आलेले ३७० कलम रद्द करून टाकले. या ऐतिहासिक निर्णयाचे संपूर्ण देशवासियांनी स्वागत केले असले तरी या मुद्यावर नेमकी कोणती भुमिका घ्यावी या बाबत कॉंग्रेस गोंधळात आहे. कॉंग्रेसचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्त्व्ये या मुद्द्यावर करीत आहेतकॉंग्रेसने कलम ३७० मुद्द्यावर आपली भुमिका स्पष्ट करावी. पराभवानंतर अध्यक्षपदा सोडणाऱ्या  राहूल गांधी यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, परंतु कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या संबंधी भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. राहूल गांधी यांचा उल्लेख त्यांनी ‘रणछोडदास’ असा केला.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसBJPभाजपा