शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
2
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
7
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
8
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
9
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
10
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
11
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
12
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
13
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
14
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

गोव्यातही सॅन्ड माफिया, कामुर्ली पंचायतीचे आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:16 PM

प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्दे-  प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. प्रशासनातील विविध खात्यांच्या नजरेला हा प्रकार आणून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.वेळीच आवर न घातल्यास केरळ, तामिळनाडूसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नसल्याचे मत पंचायतीकडून व्यक्त करण्यात आले आहे. 

म्हापसा -  प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. प्रशासनातील विविध खात्यांच्या नजरेला हा प्रकार आणून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यावर वेळीच आवर न घातल्यास केरळ, तामिळनाडूसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नसल्याचे मत पंचायतीकडून व्यक्त करण्यात आले आहे. 

सात पंचसदस्य असलेल्या या पंचायतीचे सरपंच विशांत गावकर, उपसरपंच दिव्या परब, पंचसदस्य तुषार नाईक, शरद गाड, दशरथ हळर्णकर तसेच अभय पेडणेकर उपस्थित होते. या प्रश्नावर स्थानिक आमदार नीळकंठ हळर्णकर हे गप्प असून प्रश्नावर तोडग्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्याचा तसेच गरज पडल्यास हरित लवादात सुद्धा जाण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सरपंच विशांत गावकर यांनी दिली. 

ज्या भागात रेती उत्खनन सुरू आहे तो भाग अतिसंवेदनशील भाग आहे. ज्या प्रमाणावर सध्या उत्खनन सुरू आहे ते पाहता तेथील जलसंपदेवर परिणाम होणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. भागातील नदीला लागून असलेला बांध सुद्धा कमकुवत झाला असून त्यातील शेती व्यवसायावर सुद्धा परिणाम होण्याची भीती गावकर यांनी व्यक्त केली. मच्छीमारी सुद्धा बंद करण्याची पाळी आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

15 वर्षांपूर्वी कुचेली भागात फक्त दोन व्यावसायिक होते. आजच्या घडीला अगणित असे व्यावसायिक तयार झाले आहेत. दिवसाला किमान दीडशे ट्रक रेती वाहतूक या भागातून केली जात असल्याची माहिती दिली. ज्यावेळी सरकारी अधिकारी तपासणीसाठी किंवा छापा मारण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना आगाऊ कल्पना दिली जात असल्याने तेथील व्यवसाय बंद ठेवली जातो. हा प्रकार फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच होऊ शकते असेही ते म्हणाले. 

उत्खननाचे विपरीत परिणाम गावावर व्हायला लागले आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून शांतता भंग होण्याच्या मार्गावर असल्याचे गाड म्हणाले. होत असलेल्या वाहतुकीमुळे गावातून वाहने चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. मुलांच्या अभ्यासावर, जेष्ठांवर सुद्धा परिणाम व्हायला लागल्याची माहिती यावेळी दिली. 

या मुद्यावर नदीच्या दुसऱ्या बाजूला पेडणे तालुक्यात असलेल्या पार्से पंचायतीने विशेष ग्रामसभा घेवून सदर प्रकाराला विरोध केला होता. कामुर्ली पंचायतीने सुद्धा ग्रामसभेतून विरोध दर्शवून कसलाच फायदा झाला नसल्याची माहिती सरपंच विशांत गावकर यांनी दिली. काही लोक मात्र पंचायतीवर दोषारोप करु लागले असून अशा प्रकारावर नियंत्रण ठेवणे पंचायतीच्या आवाक्या बाहेरील असल्याची माहिती पत्रकारांना दिली. 

टॅग्स :goaगोवा