शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या राज्यपालांची मेघालयात बदली; भगतसिंह कोश्यारींकडे अतिरिक्त पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 12:17 IST

मुख्यमंत्र्यांसोबतचा संघर्ष भोवला

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या काही निर्णयांवर जाहीरपणो टीका करून मुख्यमंत्र्यांशी संघर्ष केलेले राज्यपाल सत्यपाल मलिक यांची अखेर मंगळवारी गोव्याहून बदली झाली आहे. मलिक हे अनेक सामाजिक विषयांवरून गोमंतकीयांच्या आदरास पात्र ठरले. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांविरूद्धचा संघर्ष भोवला. त्यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी जारी झाला.

सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मिरहून गोव्यात पाठविले गेले होते. ते सक्रिय राज्यपाल होते. त्यांची नियुक्ती राज्यपाल म्हणून मेघालयाला करण्यात आली आहे. तूर्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त ताबा सोपविला गेला आहे.25 ऑक्टोबर 2019 रोजी सत्यपाल मलिक यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री सावंत यांनी काबो राजनिवासाकडेच आणखी एक नवे राजभवन बांधण्याची घोषणा अलिकडेच केल्यानंतर राज्यपाल मलिक यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला होता.

गोवा अगोदरच आर्थिक अडचणीत आहे व अशावेळी कोविड व्यवस्थापनावरच व राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावरच सरकारने पूर्ण लक्ष केंद्रीत करावे असा सल्ला राज्यपालांनी दिला होता. नवे राजभवन सध्या बांधण्याची गरज नाही. नवे राजभवन बांधण्याची घोषणा अविचारी पद्धतीची आहे असे राज्यपाल म्हणाले होते. तत्पूर्वी गोवा सरकार कोविड व्यवस्थापनात कमी पडत असल्याचेही निरीक्षण राज्यपालांनी नोंदवले होते. आपण मिडियाच्या विरोधात जे काही बोललोच नाही ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या तोंडी घातले व मिडियाला सांगितले असाही आक्षेप राज्यपालांनी घेऊन मुख्यमंत्री सावंत यांच्यावर अत्यंत कडक टीका केली होती. मुख्यमंत्री व भाजप त्यामुळे खूप नाराज झाला होता.

राज्यपालांची गोव्याहून बदली करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे वृत्त केवळ लोकमतनेच त्यावेळी पहिल्या पानावर दिले होते. राज्यपालांना मध्य प्रदेशला बदलीवर पाठवण्याचा अगोदर केंद्राचा विचार होता. तथापि, त्यांना आता मेघालयाला पाठवले गेले आहे. राज्यपाल मलिक यांना गोव्यातील विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा भेटत होते. विरोधकांनी व गोव्यातील विविध समाज घटकांनी राज्यपालांचे कौतुक चालविले होते. तथापि, सरकार दिल्लीला तक्रारी करत होते व त्यामुळे मलिक यांची बदली झाली आहे.

गेल्या 15 रोजी स्वातंत्र्य दिनी राज्यपाल मलिक यांनी राजभवनवर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे त्यावेळी राज्यपालांना शेवटचे भेटले होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्र