शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई - कृषीमंत्री रवी नाईक

By पूजा प्रभूगावकर | Updated: July 17, 2024 12:45 IST

पणजी: राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकार ...

पणजी: राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकार नुकसानभरपाई देईल असे कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी संचालकांना दिले आहेत. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतरच नक्की किती नुकसान झाले हे समजेल. त्यावर आताच बोलणे कठिण आहे, कारण अजूनही पावसाचा जोर कमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री नाईक म्हणाले, की शेतकरी हे कष्टकरी तसेच गरीब लोक आहेत. त्यामुळे पावसामुळे त्यांच्या शेती, बागायतीचे नुकसान झाल्याने त्यांना सरकार नक्कीच नुकसानभरपाई देणार. राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. याबाबतचा अहवाल आपण कृषी खात्याकडे मागवला आहे. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, कोणत्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले याचा तपशील खाते सादर करेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी