शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई - कृषीमंत्री रवी नाईक

By पूजा प्रभूगावकर | Updated: July 17, 2024 12:45 IST

पणजी: राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकार ...

पणजी: राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकार नुकसानभरपाई देईल असे कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी संचालकांना दिले आहेत. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतरच नक्की किती नुकसान झाले हे समजेल. त्यावर आताच बोलणे कठिण आहे, कारण अजूनही पावसाचा जोर कमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री नाईक म्हणाले, की शेतकरी हे कष्टकरी तसेच गरीब लोक आहेत. त्यामुळे पावसामुळे त्यांच्या शेती, बागायतीचे नुकसान झाल्याने त्यांना सरकार नक्कीच नुकसानभरपाई देणार. राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. याबाबतचा अहवाल आपण कृषी खात्याकडे मागवला आहे. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, कोणत्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले याचा तपशील खाते सादर करेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी