शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Goa Election 2022: राज्याचा वारसा, अभिमान जपू; गोव्यात तृणमूल काँग्रेसचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 11:50 IST

Goa Election 2022: गृहलक्ष्मी, युवा शक्ती, घर मालकी योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) गोमंतकीयांना ‘गृहलक्ष्मी’, ‘युवा शक्ती’ आणि ‘माझे घर, मालकी हक्क’ या तीन योजनांची माहिती देण्यासाठी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. येथील पक्ष कार्यालयात एआयटीसीचे नेते प्रख्यात क्रिकेटपटू कीर्ती आझाद आणि टीएमसीच्या नेत्या अविता बांदोडकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

‘जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त गोमंतकीयांना जमिनीवर हक्क नाही. सुमारे २०,००० मुंडकारांची प्रकरणे अजूनही मामलेदारांकडे प्रलंबित आहेत. आजही राज्यातील ५०,००० हून अधिक कुटुंबांकडे जमीन किंवा घरे नाहीत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ना भाजपने केला, ना काँग्रेसने. परंतु ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 'टीएमसी'ने ‘माझे घर, मालकी हक्क’ अभियान लाँच केले आहे. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ताब्यातील जमीन वा घराची मालकी मिळेल. इतकेच नाही तर बेघर कुटुंबांना ५०,०० हून अधिक अनुदानित घरे दिली जातील’ असे अविता बांदोडकर म्हणाल्या.

बांदोडकर म्हणाल्या, ‘आमच्या घरोघरी जाण्याच्या मोहिमेदरम्यान, घर नसल्यामुळे पिढ्या न पिढ्या त्रस्त असलेल्या लोकांना भेटलो. त्यांचे दुःख आम्हाला संपवायचे आहे.’ या योजनांच्या व्यवहार्यतेची माहिती देताना एआयटीसीचे नेते, क्रिकेटपटू कीर्ती आझाद म्हणाले, ‘गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक घरातील एका महिलेला ५,००० रुपये प्रती महिना मिळतील. 

राज्यात या योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि आरबीआय आम्हाला आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल. जर आपण गृहलक्ष्मी आणि युवा शक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर दोघांसाठी लागणारे वार्षिक बजेट एकूण बजेटच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, जे सहज शक्य आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर २५० दिवसांत सर्व योजना लागू करू. आमच्या घरोघरच्या मोहिमे दरम्यान, आम्हाला जाणवले आहे की लोक आमच्या आश्वासनांना स्वीकारतात आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’

टागोर, बोस बाहेरचे आहेत का?

तृणमूलवर बाहेरचा पक्ष असल्याचा होत असलेल्या आरोपाबाबत कीर्ती आझाद यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाष बोस हे बंगालचे आहेत की भारताचे? शिवाजी महाराज मराठी की भारतीय? आम्ही बाहेरचे आहोत तर पंतप्रधान मोदी दिल्लीत काय करत आहेत? राज्याचा वारसा जतन करण्यासाठी आणि राज्यात शांतता, समृद्धी आणि बंधुता वाढवण्यासाठी 'टीएमसी' प्रयत्न करेल’ असे आझाद म्हणाले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेस