शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: राज्याचा वारसा, अभिमान जपू; गोव्यात तृणमूल काँग्रेसचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 11:50 IST

Goa Election 2022: गृहलक्ष्मी, युवा शक्ती, घर मालकी योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) गोमंतकीयांना ‘गृहलक्ष्मी’, ‘युवा शक्ती’ आणि ‘माझे घर, मालकी हक्क’ या तीन योजनांची माहिती देण्यासाठी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. येथील पक्ष कार्यालयात एआयटीसीचे नेते प्रख्यात क्रिकेटपटू कीर्ती आझाद आणि टीएमसीच्या नेत्या अविता बांदोडकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

‘जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त गोमंतकीयांना जमिनीवर हक्क नाही. सुमारे २०,००० मुंडकारांची प्रकरणे अजूनही मामलेदारांकडे प्रलंबित आहेत. आजही राज्यातील ५०,००० हून अधिक कुटुंबांकडे जमीन किंवा घरे नाहीत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ना भाजपने केला, ना काँग्रेसने. परंतु ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 'टीएमसी'ने ‘माझे घर, मालकी हक्क’ अभियान लाँच केले आहे. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ताब्यातील जमीन वा घराची मालकी मिळेल. इतकेच नाही तर बेघर कुटुंबांना ५०,०० हून अधिक अनुदानित घरे दिली जातील’ असे अविता बांदोडकर म्हणाल्या.

बांदोडकर म्हणाल्या, ‘आमच्या घरोघरी जाण्याच्या मोहिमेदरम्यान, घर नसल्यामुळे पिढ्या न पिढ्या त्रस्त असलेल्या लोकांना भेटलो. त्यांचे दुःख आम्हाला संपवायचे आहे.’ या योजनांच्या व्यवहार्यतेची माहिती देताना एआयटीसीचे नेते, क्रिकेटपटू कीर्ती आझाद म्हणाले, ‘गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक घरातील एका महिलेला ५,००० रुपये प्रती महिना मिळतील. 

राज्यात या योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि आरबीआय आम्हाला आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल. जर आपण गृहलक्ष्मी आणि युवा शक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर दोघांसाठी लागणारे वार्षिक बजेट एकूण बजेटच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, जे सहज शक्य आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर २५० दिवसांत सर्व योजना लागू करू. आमच्या घरोघरच्या मोहिमे दरम्यान, आम्हाला जाणवले आहे की लोक आमच्या आश्वासनांना स्वीकारतात आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’

टागोर, बोस बाहेरचे आहेत का?

तृणमूलवर बाहेरचा पक्ष असल्याचा होत असलेल्या आरोपाबाबत कीर्ती आझाद यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाष बोस हे बंगालचे आहेत की भारताचे? शिवाजी महाराज मराठी की भारतीय? आम्ही बाहेरचे आहोत तर पंतप्रधान मोदी दिल्लीत काय करत आहेत? राज्याचा वारसा जतन करण्यासाठी आणि राज्यात शांतता, समृद्धी आणि बंधुता वाढवण्यासाठी 'टीएमसी' प्रयत्न करेल’ असे आझाद म्हणाले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेस