शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Goa Assembly Election 2022:गोव्यात पुन्हा कमळ फुलणार की परिवर्तन होणार? रेकॉर्डब्रेक मतदानानंतर मिळताहेत असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:27 IST

Goa Assembly Election 2022: काल गोवा विधानसभेसाठी तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाल्याने आता गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार की राज्यात सत्ता परिवर्तन होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे.

पणजी - पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात यावेळी विधासभेची निवडणूक चांगलीच रंगली. त्यातच सत्ताधारी भाजपा, मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस, मगोप या प्रमुख पक्षांसह आप, तृणमूल काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनेक प्रमुख नेते अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने गोव्यातील विधानसभा चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, काल गोवा विधानसभेसाठी तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाल्याने आता गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार की राज्यात सत्ता परिवर्तन होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. दरम्यान, वाढलेले मतदान म्हणजे राज्यातील सत्ताधारी भाजपाविरोधातील लाट असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोव्यामधील दोन जिल्ह्यांपैकी दक्षिण गोव्यामध्ये ७८ टक्के मतदान झाले. तर उत्तर गोव्यामध्ये ७९ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक ८९.६१ टक्के मतदान हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झाले. प्रमोद सावंत २०१२ आणि २०१७ मध्ये येथून निवडणूक जिंकले होते. तर गोव्यात सर्वात कमी ७०.२ टक्के मतदान हे बेनोलिम मतदारसंघात झाले.

या मोठ्या प्रमाणावरील मतदानामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. एकंदरित चित्र पाहता भाजपाविरोधातील मतदानाची विरोधी पक्षांमध्ये विभागणी न होता ती एकगठ्ठा काँग्रेसकडे गेल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठ्या प्रमाणावरील मतदान हे भाजपा सरकारच्या समर्थनार्थ झालेले आहे, असा दावा केला आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता सत्ताधारी भाजपाविरोधात अनेक पक्ष रिंगणात असल्याने या पक्षांमध्ये मतांची विभागणी झाल्यास त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. पण तशी विभागणी न झाल्यास त्याचा फटका भाजपाला बसू शकतो आणि कांग्रेस भाजपाला आव्हान देऊ शकतो.

भाजपा आणि काँग्रेससोबतच आप, तृणमूल काँग्रेस आणि काही अपक्षही या निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० मार्चला लागणाऱ्या निकालात कुठल्या एका पक्षाला बहुमत मिळणार की, त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊन छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वधारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआपPoliticsराजकारण