शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election 2022: गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत, निकालापूर्वीच भाजपा आणि काँग्रेसने आखली अशी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 13:04 IST

Goa Assembly Election 2022: गोव्यातील मतदानप्रक्रिया आटोपल्यावर गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत मिळत आहेत. गोव्यात कुठल्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने काँग्रेस आणि भाजपाने अनेक अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

पणजी - देशातील छोट्या राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यामध्ये यावेळच्या विधानसभा निडणुकीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, गोव्यातील मतदानप्रक्रिया आटोपल्यावर गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत मिळत आहेत. गोव्यात कुठल्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने काँग्रेस आणि भाजपाने अनेक अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा असून, सरकार स्थापन करण्यासाठी येथे कुठल्याही पक्षाला २१ जागा जिंकणे आवश्यक आहे.

मात्र सध्या भाजपा आणि काँग्रेस दोन्ही माध्यमांसमोर आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. याबाबत काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, गोव्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील,असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला आपल्या उमेदवारांकडून खूप चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. गोव्यातील जनतेने परिवर्तनाच्या बाजूने मतदान केले आहे. आता आमच्याकडे बहुमतासाठी संख्या कमी पडली तर आम्ही निश्चितपणे समान विचारधारा असलेल्या उमेदवारांची मदत घेऊ. आपण भाजपाविरोधात लढलो होतो, ही बाब अपक्ष उमेदवारांनी लक्षात घेतली पाहिजे. सरकार स्थापन करून ते चालवण्यासाठी आम्हाला सर्वांचा पाठिंबा हवा आहे. काँग्रेस हा असा एकमेवर पक्ष आहे, जो सर्वांचा पाठिंबा घेईल आणि कुठल्याही त्रासाविना सरकार चालवेल.

तर भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा असा एकमेव पक्ष आहे, जो सरकार स्थापन करू शकेल. भाजपाकडे संख्याबळ कमी असलं तरीही भाजपा सरकार स्थापन करेल. एका नेत्याने सांगितले की, २०१७ मध्ये काँग्रेस १७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपाकडे १३ जागा होत्या. तरीही भाजपाने सरकार स्थापन केले होते. सर्व छोटे पक्ष भाजपाच्या समर्थनार्थ पुढे आले होते. भाजपा असा एकमेव पक्ष आहे, जो स्थिर सरकार चालवू शकतो.

त्यांनी पुढे सांगितले की, गोवा हे एक छोटे राज्य आहे. तसेच त्याला केंद्राच्या मदतीची आवश्यकता आहे. भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. त्यामुळे गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होणे हे गोव्यातील जनतेसाठी फायदेशीर ठरेल.  

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा