शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

पुरावे द्या, मगच आरोप करा; भाजपने विरोधकांना सुनावले, कारवाईचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 11:05 IST

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या विक्री घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप भाजपच्या तीन आमदारांनी काल केला. आधी पुरावे द्या, मगच बोला असा थेट इशारा देत असेच आरोप चालूच ठेवल्यास विरोधकांवर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार करू, असा थेट इशारा सोमवारी भापजचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते. आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, हरयाणा व महाराष्ट्रातील पराभवाने विरोधक वैफल्यग्रस्त बनले आहेत. नोकऱ्या विक्रीच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. कोणताही पुरावा नसताना वैयक्तिक चारित्र्यहनन सुरू आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिल्लीला जाऊन पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या, कारण गोव्यात त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, फातोर्डा ते लंडन १३० कोटी रुपयांचा घोटाळ्याबद्दल विरोधक बोलत नाहीत. एका विरोधी आमदाराचे असे म्हणणे आहे की, लोकांचे पैसे परत केले. परंतु, त्याने प्रश्न संपला असे होत नाही. फसवणूक झालेली आहे. आमदाराच्या सेक्स्टॉर्शनच्या बाबतीतही विरोधक गप्प आहेत. हे खंडणी प्रकरण की सेक्स स्कॅण्डल हा मोठा प्रश्न आहे. कार्ल्स यांनी स्वतः याबद्दल पुढे येऊन बोलायला हवे; परंतु ते कुठे लपले आहेत, याचा पत्ता नाही.

कार्लस यांनी वरील प्रकरणात जनतेसमोर येऊन काय ते स्पष्ट करायला हवे. हे खंडणी प्रकरण? सेक्स स्कॅण्डल की नातेसंबंध हे उघड व्हायला हवे. कार्लस यांना कोणी फसवलेले नाही. त्यांनी स्वतःच तक्रार दिली आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असेही वेर्णेकर म्हणाले.

... म्हणून दिल्लीत जाऊन ते बोलले!

फळदेसाई म्हणाले की, आपचे केंद्रीय नेते संजय सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आरोप केले; परंतु कोणतेच पुरावे दिले नाहीत. नोकऱ्या विक्री प्रकरणाचा उगम कुठून झाला हे सर्वांनाच ठाऊक आहे. सरकारने कोणाचीही गय केलेली नाही. नोकर भरतीसाठी आता कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून २८५ पदे जाहीर केली. ही सर्व पदे पारदर्शक पद्धतीने भरली जाणार आहेत. सावंत सरकारने भू- बळकाव प्रकरणात कडक कारवाई केली. चौकशीसाठी आयोग नेमला. शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत यासाठी कायदा केला. अशा अनेक चांगल्या गोष्टी केल्याने विरोधकांना ते खुपते आहे.

'कारवाईसाठी सर्व खुले' 

आरोप बिनबुडाचे आहेत तर मग बदनामीचा खटला का घालत नाही, असा प्रश्न मंत्री फळदेसाई यांना केला असता ते म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सबबीखाली असे खटले फेटाळले जातात. परंतु प्रवक्ते गिरिराज पें वेर्णेकर यांनी असा स्पष्ट इशारा दिला की, जर का विरोधकांनी निराधार आरोप चालूच ठेवले तर त्यांच्यावर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार आम्ही करू.

मुख्यमंत्री व कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप थांबवा 

नोकऱ्या विक्री प्रकरणी विरोधक पातळी सोडून बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सडेतोडपणे निर्णय घेत आहे. शिवाय प्रशासनही सुरळीत चालले आहे. ते न पाहवल्यानेच अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा