शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पुरावे द्या, मगच आरोप करा; भाजपने विरोधकांना सुनावले, कारवाईचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 11:05 IST

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या विक्री घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप भाजपच्या तीन आमदारांनी काल केला. आधी पुरावे द्या, मगच बोला असा थेट इशारा देत असेच आरोप चालूच ठेवल्यास विरोधकांवर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार करू, असा थेट इशारा सोमवारी भापजचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते. आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, हरयाणा व महाराष्ट्रातील पराभवाने विरोधक वैफल्यग्रस्त बनले आहेत. नोकऱ्या विक्रीच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. कोणताही पुरावा नसताना वैयक्तिक चारित्र्यहनन सुरू आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिल्लीला जाऊन पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या, कारण गोव्यात त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, फातोर्डा ते लंडन १३० कोटी रुपयांचा घोटाळ्याबद्दल विरोधक बोलत नाहीत. एका विरोधी आमदाराचे असे म्हणणे आहे की, लोकांचे पैसे परत केले. परंतु, त्याने प्रश्न संपला असे होत नाही. फसवणूक झालेली आहे. आमदाराच्या सेक्स्टॉर्शनच्या बाबतीतही विरोधक गप्प आहेत. हे खंडणी प्रकरण की सेक्स स्कॅण्डल हा मोठा प्रश्न आहे. कार्ल्स यांनी स्वतः याबद्दल पुढे येऊन बोलायला हवे; परंतु ते कुठे लपले आहेत, याचा पत्ता नाही.

कार्लस यांनी वरील प्रकरणात जनतेसमोर येऊन काय ते स्पष्ट करायला हवे. हे खंडणी प्रकरण? सेक्स स्कॅण्डल की नातेसंबंध हे उघड व्हायला हवे. कार्लस यांना कोणी फसवलेले नाही. त्यांनी स्वतःच तक्रार दिली आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असेही वेर्णेकर म्हणाले.

... म्हणून दिल्लीत जाऊन ते बोलले!

फळदेसाई म्हणाले की, आपचे केंद्रीय नेते संजय सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आरोप केले; परंतु कोणतेच पुरावे दिले नाहीत. नोकऱ्या विक्री प्रकरणाचा उगम कुठून झाला हे सर्वांनाच ठाऊक आहे. सरकारने कोणाचीही गय केलेली नाही. नोकर भरतीसाठी आता कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून २८५ पदे जाहीर केली. ही सर्व पदे पारदर्शक पद्धतीने भरली जाणार आहेत. सावंत सरकारने भू- बळकाव प्रकरणात कडक कारवाई केली. चौकशीसाठी आयोग नेमला. शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत यासाठी कायदा केला. अशा अनेक चांगल्या गोष्टी केल्याने विरोधकांना ते खुपते आहे.

'कारवाईसाठी सर्व खुले' 

आरोप बिनबुडाचे आहेत तर मग बदनामीचा खटला का घालत नाही, असा प्रश्न मंत्री फळदेसाई यांना केला असता ते म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सबबीखाली असे खटले फेटाळले जातात. परंतु प्रवक्ते गिरिराज पें वेर्णेकर यांनी असा स्पष्ट इशारा दिला की, जर का विरोधकांनी निराधार आरोप चालूच ठेवले तर त्यांच्यावर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार आम्ही करू.

मुख्यमंत्री व कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप थांबवा 

नोकऱ्या विक्री प्रकरणी विरोधक पातळी सोडून बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सडेतोडपणे निर्णय घेत आहे. शिवाय प्रशासनही सुरळीत चालले आहे. ते न पाहवल्यानेच अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा