शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

पुरावे द्या, मगच आरोप करा; भाजपने विरोधकांना सुनावले, कारवाईचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 11:05 IST

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या विक्री घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप भाजपच्या तीन आमदारांनी काल केला. आधी पुरावे द्या, मगच बोला असा थेट इशारा देत असेच आरोप चालूच ठेवल्यास विरोधकांवर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार करू, असा थेट इशारा सोमवारी भापजचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते. आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, हरयाणा व महाराष्ट्रातील पराभवाने विरोधक वैफल्यग्रस्त बनले आहेत. नोकऱ्या विक्रीच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. कोणताही पुरावा नसताना वैयक्तिक चारित्र्यहनन सुरू आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिल्लीला जाऊन पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या, कारण गोव्यात त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, फातोर्डा ते लंडन १३० कोटी रुपयांचा घोटाळ्याबद्दल विरोधक बोलत नाहीत. एका विरोधी आमदाराचे असे म्हणणे आहे की, लोकांचे पैसे परत केले. परंतु, त्याने प्रश्न संपला असे होत नाही. फसवणूक झालेली आहे. आमदाराच्या सेक्स्टॉर्शनच्या बाबतीतही विरोधक गप्प आहेत. हे खंडणी प्रकरण की सेक्स स्कॅण्डल हा मोठा प्रश्न आहे. कार्ल्स यांनी स्वतः याबद्दल पुढे येऊन बोलायला हवे; परंतु ते कुठे लपले आहेत, याचा पत्ता नाही.

कार्लस यांनी वरील प्रकरणात जनतेसमोर येऊन काय ते स्पष्ट करायला हवे. हे खंडणी प्रकरण? सेक्स स्कॅण्डल की नातेसंबंध हे उघड व्हायला हवे. कार्लस यांना कोणी फसवलेले नाही. त्यांनी स्वतःच तक्रार दिली आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असेही वेर्णेकर म्हणाले.

... म्हणून दिल्लीत जाऊन ते बोलले!

फळदेसाई म्हणाले की, आपचे केंद्रीय नेते संजय सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आरोप केले; परंतु कोणतेच पुरावे दिले नाहीत. नोकऱ्या विक्री प्रकरणाचा उगम कुठून झाला हे सर्वांनाच ठाऊक आहे. सरकारने कोणाचीही गय केलेली नाही. नोकर भरतीसाठी आता कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून २८५ पदे जाहीर केली. ही सर्व पदे पारदर्शक पद्धतीने भरली जाणार आहेत. सावंत सरकारने भू- बळकाव प्रकरणात कडक कारवाई केली. चौकशीसाठी आयोग नेमला. शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत यासाठी कायदा केला. अशा अनेक चांगल्या गोष्टी केल्याने विरोधकांना ते खुपते आहे.

'कारवाईसाठी सर्व खुले' 

आरोप बिनबुडाचे आहेत तर मग बदनामीचा खटला का घालत नाही, असा प्रश्न मंत्री फळदेसाई यांना केला असता ते म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सबबीखाली असे खटले फेटाळले जातात. परंतु प्रवक्ते गिरिराज पें वेर्णेकर यांनी असा स्पष्ट इशारा दिला की, जर का विरोधकांनी निराधार आरोप चालूच ठेवले तर त्यांच्यावर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार आम्ही करू.

मुख्यमंत्री व कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप थांबवा 

नोकऱ्या विक्री प्रकरणी विरोधक पातळी सोडून बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सडेतोडपणे निर्णय घेत आहे. शिवाय प्रशासनही सुरळीत चालले आहे. ते न पाहवल्यानेच अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा