शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

पुरावे द्या, मगच आरोप करा; भाजपने विरोधकांना सुनावले, कारवाईचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 11:05 IST

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या विक्री घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप भाजपच्या तीन आमदारांनी काल केला. आधी पुरावे द्या, मगच बोला असा थेट इशारा देत असेच आरोप चालूच ठेवल्यास विरोधकांवर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार करू, असा थेट इशारा सोमवारी भापजचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते. आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, हरयाणा व महाराष्ट्रातील पराभवाने विरोधक वैफल्यग्रस्त बनले आहेत. नोकऱ्या विक्रीच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. कोणताही पुरावा नसताना वैयक्तिक चारित्र्यहनन सुरू आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिल्लीला जाऊन पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या, कारण गोव्यात त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, फातोर्डा ते लंडन १३० कोटी रुपयांचा घोटाळ्याबद्दल विरोधक बोलत नाहीत. एका विरोधी आमदाराचे असे म्हणणे आहे की, लोकांचे पैसे परत केले. परंतु, त्याने प्रश्न संपला असे होत नाही. फसवणूक झालेली आहे. आमदाराच्या सेक्स्टॉर्शनच्या बाबतीतही विरोधक गप्प आहेत. हे खंडणी प्रकरण की सेक्स स्कॅण्डल हा मोठा प्रश्न आहे. कार्ल्स यांनी स्वतः याबद्दल पुढे येऊन बोलायला हवे; परंतु ते कुठे लपले आहेत, याचा पत्ता नाही.

कार्लस यांनी वरील प्रकरणात जनतेसमोर येऊन काय ते स्पष्ट करायला हवे. हे खंडणी प्रकरण? सेक्स स्कॅण्डल की नातेसंबंध हे उघड व्हायला हवे. कार्लस यांना कोणी फसवलेले नाही. त्यांनी स्वतःच तक्रार दिली आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असेही वेर्णेकर म्हणाले.

... म्हणून दिल्लीत जाऊन ते बोलले!

फळदेसाई म्हणाले की, आपचे केंद्रीय नेते संजय सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आरोप केले; परंतु कोणतेच पुरावे दिले नाहीत. नोकऱ्या विक्री प्रकरणाचा उगम कुठून झाला हे सर्वांनाच ठाऊक आहे. सरकारने कोणाचीही गय केलेली नाही. नोकर भरतीसाठी आता कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून २८५ पदे जाहीर केली. ही सर्व पदे पारदर्शक पद्धतीने भरली जाणार आहेत. सावंत सरकारने भू- बळकाव प्रकरणात कडक कारवाई केली. चौकशीसाठी आयोग नेमला. शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत यासाठी कायदा केला. अशा अनेक चांगल्या गोष्टी केल्याने विरोधकांना ते खुपते आहे.

'कारवाईसाठी सर्व खुले' 

आरोप बिनबुडाचे आहेत तर मग बदनामीचा खटला का घालत नाही, असा प्रश्न मंत्री फळदेसाई यांना केला असता ते म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सबबीखाली असे खटले फेटाळले जातात. परंतु प्रवक्ते गिरिराज पें वेर्णेकर यांनी असा स्पष्ट इशारा दिला की, जर का विरोधकांनी निराधार आरोप चालूच ठेवले तर त्यांच्यावर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार आम्ही करू.

मुख्यमंत्री व कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप थांबवा 

नोकऱ्या विक्री प्रकरणी विरोधक पातळी सोडून बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सडेतोडपणे निर्णय घेत आहे. शिवाय प्रशासनही सुरळीत चालले आहे. ते न पाहवल्यानेच अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा