शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
4
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
5
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
6
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
7
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
9
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
10
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
11
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
12
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
13
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
14
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
15
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
16
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
17
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
18
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

ऐन पर्यटन मोसमात गोव्याच्या किनाऱ्यावर कचऱ्याचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 1:36 PM

गोव्यात पर्यटन मोसम ऐन भरात असून लाखो पर्यटक गोव्यात आलेले आहेत पण नेमक्या अशावेळी सुस्त प्रशासनामुळे किनारपट्टीत कचरा कुणी उचलावा याचा वाद निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे पर्यटक गोव्यात आलेले आहेत पण नेमक्या अशावेळी सुस्त प्रशासनामुळे किनारपट्टीत कचरा कुणी उचलावा याचा वाद निर्माण झाला आहे. किनाऱ्यांवर कचरा पडून असून सरकार कचरा उचलण्यासाठी नव्या यंत्रणेची नियुक्ती करू शकलेले नाही.दृष्टी नावाच्या जीवरक्षक यंत्रणेने कचरा उचलणे बंद केले आहे.

पणजी : गोव्यात पर्यटन मोसम ऐन भरात असून लाखो पर्यटक गोव्यात आलेले आहेत पण नेमक्या अशावेळी सुस्त प्रशासनामुळे किनारपट्टीत कचरा कुणी उचलावा याचा वाद निर्माण झाला आहे. अनेक किनाऱ्यांवर कचरा पडून असून सरकार कचरा उचलण्यासाठी नव्या यंत्रणेची नियुक्ती करू शकलेले नाही. दृष्टी नावाच्या जीवरक्षक यंत्रणेने कचरा उचलणे बंद केले आहे.

रुपेरी वाळूसाठी गोव्याचे किनारे प्रसिद्ध आहेत. किनाऱ्याच्या बाजूच्या काळ्याभोर खडकांवर आदळून फुटणाऱ्या सफेद लाटा लाखो  पर्यटकांना मोह पाडतात. किनाऱ्यांवर शेकडो पर्यटन गाळे तथा शॅक्स उभारले गेले आहेत. या शॅकमधून पर्यटकांना गोमंतकीय पद्धतीचे व विदेशी पद्धतीचेही खाद्य पदार्थ आणि जेवण उपलब्ध करून दिले जाते. किनाऱ्यावर शॅक्सद्वारे कचऱ्याची निर्मिती होतेच, शिवाय अन्य प्रकारेही बराच कचरा तयार होतो. दृष्टी ह्या जीवरक्षक यंत्रणोला सरकारने कचरा उचलण्याचे तात्पुरते काम दिले होते. वास्तविक दृष्टी संस्था ही फक्त किनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षा पुरविण्यासाठी आहे, पोहताना कुणी पर्यटक बुडू नये याची काळजी घेण्यासाठी आहे. मात्र पर्यटन खात्याचा आदेश मानून दृष्टी संस्थेने कचरा उचलण्याचेही काम गेले काही महिने केले. हा कचरा उचलून साळगाव येथील अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठविला गेला. दृष्टीला सरकारने दिलेल्या आदेशाची मुदत गेल्या 12 रोजी संपुष्टात आली. त्यानंतरही एक दिवस दृष्टी संस्थेने बागा-कळंगुटच्या जगप्रसिद्ध किनारपट्टीतील शॅक्सचा कचरा उचलला व प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठवून दिला. त्यानंतर मात्र दृष्टीने कचरा उचलणे बंद केले आहे. आम्हाला सरकारने नवा आदेश दिलेला नाही व गेले काही महिने आम्हाला निधीही उपलब्ध झालेला नाही व त्यामुळे आम्ही कचरा उचलणे थांबवत असल्याचे दृष्टीने जाहीर केले. त्यानंतर आता पर्यटन खात्याची धावपळ सुरू झाली आहे. कचरा पर्यटन खाते व पर्यटन विकास महामंडळ मिळून काही कामगारांच्या मदतीने उचलील असे सरकारने आता जाहीर केले आहे पण कचरा उचलण्यासाठी प्रत्यक्ष किनाऱ्यावर कामगार नियुक्त करण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी एक बैठक घेतली व कचरा उचलण्यासाठी पुढील दोन दिवसांत कृती योजना तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. गोव्यातील किनाऱ्यावर कचऱ्याची समस्या ही विद्यमान सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे झाली अशी टीका गोवा सिटीझन्स अॅक्शन फोरमच्या अध्यक्ष असलेल्या अॅड. दिया शेटकर यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. 

टॅग्स :goaगोवा