शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

सत्यशोधन समिती आज अहवाल देणार: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 07:58 IST

अहवाल हाती येताच लोकांच्या माहितीसाठी जाहीर करणार : सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी सत्यशोधन समितीचा अहवाल आज, गुरुवारी मिळणार असून तो प्राप्त झाल्यावर जनतेसाठी जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

३ मे रोजी पहाटे लईराईच्या जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू आणि ७० हून अधिक जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महसूल सचिव संदीप जॅकिस यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती नेमली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत चेंगराचेंगरीतील मृतांना एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे केलेल्या यशस्वी हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय सैन्याचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, देशभरात २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रील करण्यात आले. गोव्यात दक्षिणेत मुरगाव व उत्तरेत तिसवाडी तालुक्यात युद्धाच्या प्रसंगी घ्यावयाच्या दक्षतेसंबंधी रंगीत तालिम घेण्यात आली. किनारी राज्य म्हणून गोव्यातील विमानतळ. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची आस्थापने, मुरगांव बंदर प्राधिकरण आणि राजधानी पणजी यासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.'

आगामी विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येणार असलेला कॅग ऑडिट अहवाल, वित्त खाते अहवाल, विनियोग अहवाल आदी अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिनरल फाउंडेशन सेवेला प्रकल्प व्यवस्थापन युनिट म्हणून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुदतवाढ देण्यात आली.

१५ जणांवर उपचार सुरू

शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी २१ जणांना गोमेकॉत उपचारार्थ दाखल केले होते. पैकी ६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून अद्याप १५ जणांवर उपचार सुरू आहेत. अत्यवस्थ स्थितीत दाखल केलेल्या गंभीर जखमींची स्थिती जैसे थे असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत