शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक एकत्र आले तरीही भाजपला धोका नाही : खासदार तानावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:02 IST

'लोकमत'च्या पणजी कार्यालयास तानावडे यांनी भेट दिली. त्यावेळी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांनाही मते मिळाली तरी, भाजप-मगो युतीच्या मतांच्या प्रमाणावर परिणाम झालेला नाही. झेडपी निवडणूक व विधानसभा निवडणूक हे दोन वेगळे विषय आहेत. येत्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांची युती झाली तरी, भाजपच्या यशावर परिणाम होणार नाही असा विश्वास खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.

काल गुरुवारी 'लोकमत'च्या पणजी कार्यालयास तानावडे यांनी भेट दिली. त्यावेळी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. तानावडे म्हणाले की, सत्तरी, डिचोली, पेडणे आदी तालुक्यांमध्ये काँग्रेसचा पूर्ण सफाया झालेला आहे हे झेडपी निवडणुकीत दिसून आले. जिल्हा पंचायत निवडणूक, लोकसभेची निवडणूक व विधानसभा निवडणुकीची गणिते वेगवेगळी असतात. विरोधक एकत्र आले म्हणून मते ट्रान्सफर होत नसतात. भाजपची मते आहेत ती भाजपसोबतच राहतील, असा दावा तानावडे यांनी केला.

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने खूप सदस्य निवडून आणले. काही ठिकाणी यश मिळाले नाही, पण तिथे पक्षाचे काम सुरुच राहणार. विरोधकांमध्ये मात्र काही ठिकाणी विजय होऊन देखील युती दिसली नाही. त्यांचे एक मत भाजपलाच मिळाले. यातून विरोधकांची स्थिती काय आहे हे दिसते. असे असले तरी आम्ही कोणतीही निवडणूक गांभीर्यानेच घेत असतो, असेही खासदार तानावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दिल्लीत जास्त अनुभव मिळतो, पण...

राज्यातील राजकारण आणि दिल्लीतील राजकारण वेगळे आहे. दिल्लीत गेल्यावर तिथल्या नेत्यांशी बोलल्यावर जास्त अनुभव मिळतो, ज्ञानात भर पडते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. दिल्लीत मी खूप काही शिकलो. पण राहण्याच्या दृष्टीने गोवाच योग्य वाटतो. दिल्लीत प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच तिथले हवामान खुप त्रासदायक आहे. थंडी असली तर खूपच पडते, उकाडाही प्रचंड असतो, असे तानावडे यांनी सांगितले.

२०२७ मध्ये भाजपची सत्ता हाच संकल्प

राज्यसभेत कामाच्यादृष्टीने तिथे खूप चांगले व कठोर नियम आहे. प्रत्येक खासदाराची दर दोन तासांनी पक्षाकडून हजेरी घेतली जाते. अनुभवी राजकारणी राज्यसभेत असल्याने विषय मांडताना वेगळे दडपणही असते. पण येथे कुणी विषय मांडतो किंवा प्रश्न विचारतो त्या खासदाराला मंत्र्यांकडून तेवढाच मान मिळतो, असेही तानावडे यांनी सांगितले.

भाजपने प्रत्येक निवडणुकीत चांगले काम केले. भाजपमुळे आम्ही आहोत. २०२७ मध्ये भाजपला पुन्हा सत्तेवर आणणे हाच नव्या वर्षाचा संकल्प आहे. राज्याचे जेवढे प्रश्न राज्यसभेत मांडण्याची संधी मिळणार तेवढे प्रश्न मांडणार, असेही ते म्हणाले.

'कुशावती' जिल्ह्यामुळे नवीन खासदार मिळणार नाही. खासदार हा लोकसंख्येवरुन ठरवला जातो. पण येथे जिल्हा पंचायत उभी राहील. लोकांचा विकास बऱ्यापैकी होईल, नव्या साधनसुविधा तयार होतील. - सदानंद तानावडे, खासदार 

English
हिंदी सारांश
Web Title : Even opposition unity won't threaten BJP: MP Tanavade

Web Summary : MP Sadanand Tanavade believes BJP will succeed in 2027 assembly elections, even if opposition unites. He highlighted BJP's strength and commitment to state development, despite some ZP election setbacks. He also shared insights from his Delhi experiences.
टॅग्स :goaगोवाBJPभाजपाLokmatलोकमत